शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पिक विमा योजनेला बँंकेचा खो

By admin | Updated: July 17, 2014 00:10 IST

केंद्र शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांना संरक्षण म्हणून आपदग्रस्त परिस्थितीत मोबदला मिळण्यासाठी पिक विमा योजना लागू केली. मात्र अग्रणी बँकेच्या कामचुकारपणामुळे

गोरेगाव : केंद्र शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांना संरक्षण म्हणून आपदग्रस्त परिस्थितीत मोबदला मिळण्यासाठी पिक विमा योजना लागू केली. मात्र अग्रणी बँकेच्या कामचुकारपणामुळे सदर योजना रखडल्याचे चित्र गोरेगाव तालुक्यात आहे.
प्राप्त माहितीनुसार, केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना अंमलात आणली. सदर योजना ऐच्छिक व बिना ऐच्छिक स्वरुपाची असून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतले नाही त्यांच्याकरिता ऐच्छिक स्वरुपात असून त्याचा हप्ता प्रतिहेक्टर ३७५ रुपये राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत भरण्याची सोय शासनाने करुन दिली आहे.
पीक विमा योजनेचा कृषी कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला आहे. मात्र अग्रणी बँकेच्या उदासीन धोरणामुळे पिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. अग्रणी बँकेने स्थानिक बँकांना पिक विमा योजनेविषयी कुठलीही सूचना न दिल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेतून आल्यापावली परतावे लागत आहे. या पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै २०१४ पर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे असे शासनाचे आदेश आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांना अतिरिक्त विमा संरक्षण पाहिजे त्या शेतकऱ्यांना अधिकचे पैसे भरुन लाभ मिळविता येईल. (तालुका प्रतिनिधी)