शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक सदस्यता नोंदणीत गोंधळ

By admin | Updated: February 22, 2015 01:36 IST

सध्या प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची सदस्य संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करीत आहेत. कार्यकर्त्याच्या भरवशावर सत्ता प्राप्त करता येते.

बिजेपार : सध्या प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची सदस्य संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करीत आहेत. कार्यकर्त्याच्या भरवशावर सत्ता प्राप्त करता येते. मान सन्मान, पद पैसा मिळविण्यात येतो. यासाठी पक्षाचे सदस्य जास्तीत जास्त कसे बनविता येतील याचे प्रयत्न आहेत. भाजप राजकीय पक्षांमध्ये हायटेक पद्धतीचा वापर करीत आहे. परंतु ज्यांना सदस्य बनविण्यात आले त्यांना आपण सदस्य झाल्याचे माहितच नसते, असा प्रकार सुरू आहे.काँग्रेस पक्ष जुन्याच पद्धतीने पावती काढून प्राथमिक सदस्य बनवित आहे. भाजपा मात्र एक टोल फ्री नंबर देते, त्यावर फक्त भ्रमणध्वनी वरुन एक मिसकॉल मारावा लागतो लगेच तिकडून एसएमएस येतो. माहिती टाकली की भाजपाचे सदस्यत्व प्राप्त होते. परंतु गावखेड्यात गुराख्यापासून मजूर, कामगार, शिक्षित, अशिक्षित या जवळ-जवळ सर्वच लोकांजवळ आजच्या घडीला प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. मग भाजपाचा एखादा कार्यकर्ता काका, मामा, बडे भैय्या म्हणून त्यांच्याजवळील मोबाईल मागतो. गावात सलोख्याचे व जवळचे संबंध असल्याने आपला मोबाईल देवून टाकतात व मग तो कार्यकर्ता लगेच टोल फ्री नंबरवर मिसकॉल देतो. मॅसेज येते त्याची माहिती न सांगता देवून टाकतो व आपण भाजपाचे सदस्य झाल्याचा एसएमएस येतो. जो सदस्य होतो त्यालाही आपण त्या पक्षाचा सदस्य बनलो याची माहिती नसते. मात्र आकडा जरुर वाढत जातो आणि या गावून, या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून किती नवीन सभासद तयार करण्यात आले याचा आकडा फुगलेला दिसतो. असे प्रकार ग्रामीण भागात जोरात सुरू असल्याचे सांगितले जाते. (वार्ताहर)