शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान आमगाव तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी एकूण ६५३ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात जिल्ह्यात सर्वाधिक ८३.१३ टक्के ...

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी एकूण ६५३ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात जिल्ह्यात सर्वाधिक ८३.१३ टक्के मतदान आमगाव तालुक्यात झाले. शहरीभागापेक्षा नक्षलप्रभावित तालुक्यांमध्ये ८० टक्केच्या वर मतदान झाले आहे.

राजकारणातील प्रवेशाची पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील मुदत पूर्ण झालेल्या १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. १८९ ग्रामपंचायतींच्या एकूण १६९३ जागांपैकी ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे १३८२ जागांसाठी ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यासाठी एकूण ६५३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यासाठी ७९.८३ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकूण १ लाख २६ हजार १४४ महिला मतदार तर १ लाख २५ हजार ६०४ पुरुष मतदार अशा एकूण २ लाख ५१ हजार ७१८ मतदारांनी मतदान केले. तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पाहता सर्वाधिक ८३.१३ टक्के मतदान आमगाव तालुक्यात झाले आहे. नक्षलग्रस्त भागातील मतदारांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचंड उत्साह दिसून आला.

......

आता लक्ष विजयाच्या सुपर मनडेकडे

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण १३८२ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ३१५१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे. या सर्वांच्या भाग्याचा फैसला सोमवारी होणार असल्याने कोणत्या उमेदवारांसाठी तो विजयाचा सुपर मनडे ठरतो याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

............

गावकारभाराची सूत्रे कुणाकडे ?

राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले नव्हते. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही विजयी उमेदवारांना आपल्या गावकारभाराची सूत्रे नेमकी कुणाकडे जातात, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

........

उमेदवार गुंतले विजयाच्या समीकरणात

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळेस प्रथमच मतदानानंतर दोन दिवसांनी निकाल लागणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना गावात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून आपल्याला नेमकी किती मते मिळाली असतील याचा अंदाज घेण्यास वेळ मिळाला आहे. त्यामुळे उमेदवार सध्या आपल्या विजयाची गोळाबेरीज करण्यात गुंतले असल्याचे चित्र आहे.

......

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची अंतिम टक्केवारी

तालुका अंतिम टक्केवारी

गोंदिया ७८.२०

तिरोडा ७९.८०

गोरेगाव ८०.३७

देवरी ७७.५२

आमगाव ८३.१३

सालेकसा ७९.८२

अर्जुनी मोर ८१.२५

सडक अ ८०.२५

..............................

एकूण ७९.८३