शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या विलंबाने करपली धानाची रोपे

By admin | Updated: July 16, 2014 00:15 IST

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील

दुबार पेरणीही अशक्य : बळीराजासमोर उभे ठाकले जीवनमरणाचे संकट
अमरचंद ठवरे - बोंडगावदेवी
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची रोपे करपल्या गेली आहेत. आता दुबार पेरणी करून रोवणी करण्याचीही वेळ निघून गेल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच खचून गेला. अशा परिस्थितीत पुढील वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकणार, असा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा आहे.
रोहीणी, मृग, आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र कोरडेच गेल्याने भोळाभाबडा शेतकरी पावसाची वाट पाहात पूर्णत: खचून गेला आहे. मृग नक्षत्रातील एक-दोन सरींमुळे शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे लावले. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बियाण्यांची उगवणच झाली नाही. काही प्रमाणात वाढलेली रोपे मधल्या उघाडीदरम्यान तापलेल्या उन्हामुळे करपलेल्या अवस्थेत दिसत आहे. रोपे सुकल्याने दुबार पेरणी केल्याशिवाय गत्यंतर नाही.परंतू आता दुबार पेरणीही शक्य नसल्याचे कृषी विभाग सांगत आहे.
तालुक्यात पाच महसूल विभाग आहेत. नवेगावबांध महसूल विभागात ४०८१ हे.आर.क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. अर्जुनी/मोरगाव ४९५४ हे, महागाव ५९११ हे., केशोरी ४६९४ हे., बोंडगावदेवी ३५६३ हे. क्षेत्र ेखरीप पिकाखाली अपेक्षित आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने धानाची उगवण पूर्णपणे झाली नाही. जी रोपे आज शेताच्या बांधावर दिसत आहेत, ती पूर्णत: करपलेल्या अवस्थेत आहेत. राष्ट्रीय पंचांगानुसार मृग, आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र समजले जातात. परंतु आर्द्रा नक्षत्र पूर्णत: कोरडाच गेला, महागडी बी-बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. परंतु तळपत्या उन्हाने पऱ्ह्यांची रोपे पूर्णत: सुकून गेली.
गाढव वाहन घेऊन आलेल्या पूनर्वसू नक्षत्राने जोर दाखविण्याचे सोडून दिल्याने सूर्यराजाने आग ओकून जीवाची लाहीलाही केली. त्यात धानाचे पऱ्हे वाचविण्यासाठी भूमिपुत्रांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु हातामध्ये पाणीच नाही तर पऱ्हे कुठून वाचणार अशी विदारक परिस्थिती तालुक्यात पहायला मिळाली. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची ओलिताची सोय आहे, त्यांनी काही तुरळक प्रमाणात धानाची रोवणी केली आहे. तळपत्या उन्हाने हिरवे दिसणारे पऱ्हे मात्र आज पूर्णत: सुकलेले दिसत आहे. आता पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा फायदा किती होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात २०८३८ हे. क्षेत्रात धान रोवणी तर ११९९ हेक्टर क्षेत्रात आवत्यासाठी अपेक्षीत आहे. पेरणी झाली, रोपे उगवली, परंतु पावसाअभावी बांधातील रोपे मरणासन्न झाली. पाऊस पडण्याचे चार नक्षत्र संपल्यात जमा आहे. परंतु पावसाचा जोर अजूनही वाढलेला दिसत नाही. त्यामुळे सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकरी मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे. आता त्यांना रोख स्वरूपात मदत देण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.