शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...

By admin | Updated: February 28, 2017 01:03 IST

खेडी रोगमुक्त व सुशिक्षित, साक्षर व्हावीत यासाठी ग्रामस्वच्छता अभियान काळाची गरज आहे, ...

जनजागरण : माणिक देशमुख यांनी हुबेहुब साकारले गाडगेबाबांचे कीर्तनसंतोष बुकावन अर्जुनी मोरगावखेडी रोगमुक्त व सुशिक्षित, साक्षर व्हावीत यासाठी ग्रामस्वच्छता अभियान काळाची गरज आहे, हा मूलमंत्र देणाऱ्या वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे व्रत अमरावती येथील अभिरूची कला व क्रीडा मंदिरातर्फे ‘क्रांतियोगी गाडगेबाबा’ या एक तासाच्या नाट्य प्रस्तुतीकरणातून स्वीकारून जनजागरण करण्यात आले. शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्रालयातील उपसिचव फुलचंद मेश्राम यांनी स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ निर्मित व गाडगेबाबा अध्यासन केंद्र अमरावती विद्यापीठाद्वारे प्रायोजित कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.भारत स्वतंत्र होऊन ६९ वर्षे झालीत. आजही खेडी अडाणी-अशिक्षित व अंधश्रद्धाळू आहेत, हे देशाचे दुर्दैव ! प्रगतीला खीळ बसविणाऱ्या या गोष्टींपासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्वप्रथम खेडी शहरांशी जोडली पाहिजेत. शौचालय, वीज व पाणी या किमान गरजांची पूर्तता व्हायला हवी. तरच खेड्यातील मुलं शहरात शिकून शहाणी होतील. ‘जे आपणांसी ठावे, ते इतरांशी सांगावे,शहाणे करुन सोडावे सकल जना’याप्रमाणे वागतील असे म्हणत त्यांनी हुबेहूब गाडगेबाबा साकारले.विदर्भ संतपरंपरेतील एक अलौकिक व आगळा संत अवतरला. श्रम प्रतिष्ठेचा एक अद्भूत आविष्कार करणार कृषिपूत्र, वैराग्याचा एक अनोखा अवतार, ज्ञानगंगेचा शोध घेणारा एक मुक्तात्मा, ऋण काढून सण साजरा करु नका म्हणून सांगण्यासाठी आपला संसार उधळणारा एक मुसाफिर, लोकसेवक म्हणजे काय? याचा कृतीतून आदर्श देणारा एक महापुरुष, अनाथ अपंगाचा आधार, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, बेघरांना घर मागणारा धर्मात्मा, अंधश्रद्धेला ठाम विरोध करणारा सश्रद्ध ज्ञानयोगी, जातीभेदाची कोळिष्टके, जळमटे, झुगारणारा क्रांतियोगी द्रष्टा सन्यासी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून समाजप्रबोधन करणारा एक लोकसंग्राहक अशा अनेकविध उपाध्यांनी ओळखले जाणारे संत गाडगेबाबा. त्यांनी त्यावेळी दिलेला दृष्टांत आजही आधुनिक युगात लागू पडतो, नव्हे तर त्यांच्या कार्याची शिकवण या वैज्ञानिक युगाच्या पिढीला महाराष्ट्र शासनाद्वारे दिली जाते. त्यांचे तत्कालीन उपक्रम आज शासनाला राबवावे लागतात. असा हा वऱ्हाडातल्या शेंडगावचा देविदास व दापुऱ्याचा डेबू कर्मयोगी म्हणून ओळखला जातो. आपला संसार व घरदार सोडून माणसातील ईश्वर जागवण्यासाठी त्याने जीवाचे रान केले. त्यांच्यासोबत केवळ तुकारामांची अभंगवाणी व कबीराची वाणी होती. अपार कष्ट करण्याची तत्परता व प्रचंड सहनशीलतेच्या बळावर तो क्रांतियोगी बनला. डोक्यावर खापरं, अंगावर बावला वेष, हातात काठी आणि दुसऱ्या हातात खराटा आणि मुखात गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...चा जयघोष करणारा डेबू गाडगेबाबा झाला. ते आपल्या कीर्तनातून सांगतात.‘कर्ज काढून देवाची यात्रा करू नकागाई-बैलांची चिंता वाहात जामुलांना शिकविल्याविना राहू नकादेवाला नवस करून कोंबडी-बकरी मारु नकाआई-बापांची सेवा कराकर्ज काढून दिवसवारे करू नकाशिवाशिव पाळू नकादारू पिऊ नकादेवाचे भजन केल्याशिवाय राहू नका’त्यांनी देशाला दिलेला हा संदेश वैज्ञानिक युगातील पिढीला देण्याचे व्रत संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अध्यापन केंद्रामार्फत अभिरुची कला व क्रीडा मंदिराच्या कलावंतांनी स्वीकारले आहे. त्यांचा हा ४८ वा प्रयोग होता. गाडगेबाबांची कविता प्रा. माणिक देशमुख यांनी हुबेहुब साकारली. या नाटकाचे दिग्दर्शन एम.टी. देशमुख यांनी केले. तर अ‍ॅड. रसिका बडवेकर देशमुख, रविशंकर संगेकर, शिल्पा ढोक, स्वपनील शेळके, अभिजित देशमुख, गजानन संगेकर, प्रकाश गिरणकर, प्रियंका राजनेकर यांनी उत्कृष्ट अभिनय साकारून प्रेक्षकांना जुन्या काळात नेले.