लॉकडाऊनच्या काळात १८.६७ लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:14+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे.

A fine of Rs 18.67 lakh was recovered during the lockdown | लॉकडाऊनच्या काळात १८.६७ लाखाचा दंड वसूल

लॉकडाऊनच्या काळात १८.६७ लाखाचा दंड वसूल

Next
ठळक मुद्दे९०७८ वाहन चालकांना दणका : १३७९ वाहने केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कारोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते १० मे पर्यंत ९ हजार ७८ वाहन चालकांना दंड आकारून त्यांच्याकडून १८ लाख ६७ हजार ८०० रूपये दंड ठोठावून वसूलही केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या अश्या ९ हजार ७८ लोकांना २३ मार्च ते १० मे या काळात दंड करण्यात आला आहे. चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची कडक अमंलबजावणी सुरू केली आहे. कारण नसताना एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला व पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्या वाहन चालकाला थांबवून त्याच्या वाहनात किंवा वाहन चालवितांना कोणत्या ना कोणत्या तृट्या दाखवून पोलीस कारवाई करीत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलीस आणखीच कडक नियम लावून कारवाई करीत आहे.
हे कडक नियम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे. २३ मार्चपासून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.दुचाकी, चारचाकी अशा ९ हजार ७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १८ लाख ६७ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे हा एकमेव या मागील उद्देश आहे. रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण नसताना वाहन रस्त्यावर आले की त्या वाहनाला दंड कसा करायचा याच्याच प्रयत्नात वाहतूक पोलीस दिसत आहेत.हे जरी वाहन चालकांना योग्य वाटत नसले तरी आजघडीला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी ही कारवाई समाजाच्या हिताची आहे. दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाहीत आणि कोरोनाच्या लढाईत सर्व जिंकतील हा या मागील उद्देश आहे.

कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर सोडली वाहने
कागदपत्रे न बाळगता रस्त्यावर वाहन घेऊन येणाºया १ हजार ३७९ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदाचे कलम २०७ अंतर्गत कारवाई करून वाहन जप्त केले. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्या वाहनांना सोडण्यात आले.

लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल झाले तरी केवळ अत्यावश्यक कामाकरीताच लोकांनी बाहेर पडावे. बाहेर जायचे असेल तर एकाच वेळी सर्व कामे करावीत. विनाकारण घराबाहेर पडू नयेत.
- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.

Web Title: A fine of Rs 18.67 lakh was recovered during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.