शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सहा घाटांसाठी फेरलिलाव

By admin | Updated: February 22, 2015 01:32 IST

यावर्षी रेतीघाटांमधून मिळणाऱ्या महसुलात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आतापर्यंत दोन वेळा झालेल्या लिलावांमधून ३७ पैकी ३१ घाटांचा लिलाव होऊन ...

गोंदिया : यावर्षी रेतीघाटांमधून मिळणाऱ्या महसुलात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आतापर्यंत दोन वेळा झालेल्या लिलावांमधून ३७ पैकी ३१ घाटांचा लिलाव होऊन शासनाला ५ कोटी ६५ लाखांचा महसूल मिळाला. अजूनही ६ घाटांचा लिलाव होणे बाकी आहे. गेल्यावर्षी केवळ २७ घाट लिलावात गेले होते. त्यातून शासनाला अवघा २.२० कोटींचा महसूल मिळाला होता.यावर्षी लिलावासाठी ३७ रेतीघाट पात्र ठरले होते. ई-टेंडरिंगद्वारे जानेवारीत काढलेल्या निविदा प्रक्रियेत सुरूवातीला २६ घाट लिलावात गेले. त्यांची शासकीय किंमत (किमान अपेक्षित) १ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपये होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना या किमतीपेक्षा चार पट अधिक म्हणजे ५ कोटी २५ लाख २१ हजार ९५ रुपये किंमत मिळाली. त्यानंतर उर्वरित ११ रेतीघाटांसाठी दुसऱ्या वेळी लिलाव प्रक्रिया झाली. त्यात ५ घाटांचा लिलाव झाला. त्या घाटांची शासकीय किंमत (अपसेट प्राईज) ३२ लाख ८१ हजार असताना प्रत्यक्षात ३९ लाख ७६ लाख ७२२ रुपयात त्यांचा लिलाव झाला.जिल्ह्यात एकूण १०७ रेतीघाट आहेत. गेल्यावर्षी लिलावात गेलेल्या घाटांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपली. भूजल सर्व्हेक्षण विभागाने ४९ घाटांना लिलावास पात्र ठरविले होते. मात्र भौगोलिक अडचणींमुळे ४ रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करणे कठीण असल्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाकडून ४५ घाटांचाच प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी ३७ घाटांना मंजुरी मिळाली. गेल्यावर्षी ४४ रेतीघाट पात्र ठरले होते. त्यातून ४ कोटी १५ लाखांचा महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र तीन वेळा ई-टेंडरिंग केल्यानंतरही त्यापैकी केवळ २७ घाटांचा लिलाव होऊ शकला. त्यातून प्रत्यक्षात २ कोटी २० लाखांचा महसूल शासनाला मिळाला होता. त्या तुलनेत यावर्षी महसुलात चांगलीच वाढ झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)लिलाव झालेले तीन घाट वांद्यातपहिल्या ई-टेंडरिंगमध्ये गेलेल्या २७ रेतीघाटांपैकी ३ रेतीघाट अजून वांद्यात आहेत. त्या घाटांची रक्कम संबंधित कंत्राटदारांनी अजून जिल्हा प्रशासनाकडे भरलेलीच नाही. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त होऊन त्या घाटांचा पुन्हा लिलाव होऊ शकतो. त्यात राका पळसगाव, सावंगी कोहळीटोला आणि बनाथर या तीन घाटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यातील राका पळसगाव या घाटाची शासकीय किंमत २ लाख १५ हजार असताना संबंधित निविदाधारकाने आॅनलाईन निविदा भरताना ६ लाख १० हजार रुपये किंमत टाकताना एक शून्य चुकून जास्तीचा टाकला. त्यामुळे ती किंमत ६१ लाख अशी पडली. २ लाखांचा घाट ६१ लाखात घ्यावा लागत असल्यामुळे कंत्राटदार ती रक्कम भरण्याच्या मनस्थितीत नाही.