शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेचा ९० लाभार्थ्यांना लाभ

By admin | Updated: July 16, 2014 00:16 IST

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्याकरिता आम आदमी विमा योजना २ आॅक्टोबर २००६ पासून राबविण्यास सुरुवात केली. भारतीय

सालेकसा : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्याकरिता आम आदमी विमा योजना २ आॅक्टोबर २००६ पासून राबविण्यास सुरुवात केली. भारतीय आयुर्विमा महामंडाकडून लाभार्थ्यांचा विमा उतरण्यात येतो व विम्याची रक्कम शासनाकडून भरण्यात येते. यासाठी ग्रामीण भागातील भूमिहिन कुटुंबातील १६ ते ५९ वयोगटातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख मात्र राहू शकतो.
सालेकसा तालुक्यात सन २०११-१२ ला २ हजार २५७, २०१२-१३ ला ६ हयार ०८६, सन २०१३-१४ ला ५ हजार ०६१ नागरिकांनी आम आदमी विमा योजनेचे अर्ज भरले. आतापर्यंत १४ हजार ४०४ नागरिकांचे अर्ज आॅनलाईन तहसील कार्यालयामार्फत भरण्यात आली.
यापैकी सन २०११-१२ ला २२ व्यक्ती, २०१२-१३ ला १४ व्यक्ती सन २०१३-१४ ला ४९ व्यक्तींचा नैसर्गिक मृत्यू झाला तर अपघातात ५ व्यक्ती मरण पावले. या मृत व्यक्तींना सन २०११-१२ मध्ये ६ लाख ६० हजार रुपये, २०१२-१३ मध्ये ४ लाख २० हजार रुपये व २०१३-१४ मध्ये १४ लाख ७० हजार रुपयांची रक्कम विम्यांतर्गत मृतकाच्या नातेवाईकांना देण्यात आली.
अपघाती मृतकांना ३ लाख ७५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. या आम आदमी विमा योजनेपासून सालेकसा तालुक्यातील अनेक गावातील नागरिक अजूनही वंचित आहेत.
त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी अर्ज भरले त्यांचे वय ५९ वर्षाचे झाल्यावर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक अर्ज रद्द झालेले आहे.या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार खापेकर, नायब तहसीलदार आर.टी. लांजेवार यांनी नागरिकांना केले आहे. (तालुका प्रतिनिधी)