शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टीला लघुउद्योगाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: February 22, 2015 01:35 IST

वीटभट्टी कामगार व मालकांना शासनाच्या अनेक जाचक अटींमुळे आतापर्यंत सुविधा मिळत नव्हत्या. गावातच कामगाराला काम मिळवून देणाऱ्या विटाभट्टी ...

गोरेगाव : वीटभट्टी कामगार व मालकांना शासनाच्या अनेक जाचक अटींमुळे आतापर्यंत सुविधा मिळत नव्हत्या. गावातच कामगाराला काम मिळवून देणाऱ्या विटाभट्टी मालकांना व मजुरांना उद्योगीय सुविधा मिळाव्या आणि वीटभट्टीला लघुउद्योगाचा दर्जा मिळावा म्हणून आपण उद्योगमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.तालुक्यातील डव्वा येथे जिल्हा वीटभट्टी कंत्राटदार संघटनेच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व नवनिर्वाचित आमदार व पालकमंत्र्यांच्या सत्कार समारंभात ते शुक्रवारी बोलत होते. जि.प. शाळा डव्वाच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, कृषी सभापती मोरेश्वर कटरे, माजी आ.हेमंत पटले, पं.स. सभापती चित्रकला चौधरी, संतोष चव्हाण, भरत क्षत्रीय, भीटभट्टी असोसिएशनचे अध्यक्ष मुस्तफा सिद्दिकी, सरपंच जगदीश कोल्हे, उपसरपंच दिनेश शहारे, तंमुस अध्यक्ष लोकेश बिसेन, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्या आला. यावेळी आ.विजय रहांगडाले म्हणाले, दरवर्षी शासनाच्या व खासगी इमारतींसाठी गावातूनच विटांचा पुरवठा केला जातो. आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी जाचक अटी लावून या उद्योगाची गळचेपी केली. यापुर्वी सुद्धा आपण वीटभट्टी कामगाव व कंत्राटदारांच्या पाठीशी होतो व आताही आम्ही आपल्या पाठिशी आहोत, असे सांगितले.पर्यावरणाच्या अटीमुळे विट भट्टी चालकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागते. आमच्या जिल्ह्यात राईस मिलमुळे प्रवाशांना व गाडी चालकांना होत असलेल्या त्रासाबद्दल कुणीच काही बोलत नाही. विटभट्टी कामगारांचा विमा उतरवणे आवश्यक केल्याने होत असलेल्या त्रासाबद्दल कुणीच काही बोलत नाही. संघटनेने याकडे लक्ष पुरवावे असे मत हेमंत पटले यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. बोपचे यांनी संघटनेच्या मागण्या रास्त असून वीटभट्टी कामगार व मालकांना न्याय मिळाला व जाचक अटी शिथील करण्यात याव्या तेव्हाच विट भट्टीचा मालक व कामगारांना अनेक सुविधा मिळू शकेल असे सांगितले. दरवर्षी आठ महिने चालणारा हा उद्योग असल्यामुळे याला लघुउद्योगाचा दर्जा मिळालाच पाहिजे, यासाठी आपणही प्रयत्न करुन असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे मोहन गौतम यांनी केले. संचालन अशोक हरिणखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश लालवानी, दिगंबर लिचडे, कमलेश सोनवाने, मुकेश हलमारे, गणेश तुरकर, गुड्डू कोल्हे, विजय चक्रवर्ती, मिठाईलाल चक्रमवर्ती, तुळशी चक्रवर्ती शाकिर खान, प्रभू चक्रवर्ती, किशोर धपाडे, राकेश कोल्हे, आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विटभट्टी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले व शेकडो कामगारांची आरोग्य तपासणी करुन औषधी वितरीत करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)