शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

७९ कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 23, 2015 02:03 IST

गेल्या १५ वर्षापासून हिवतापापासून जिल्हावासीयांचा बचाव करण्याचे काम फवारणी कामगार करीत आहेत. त्यांना स्थायी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१३ मध्ये धडकले.

गोंदिया : गेल्या १५ वर्षापासून हिवतापापासून जिल्हावासीयांचा बचाव करण्याचे काम फवारणी कामगार करीत आहेत. त्यांना स्थायी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१३ मध्ये धडकले. मात्र, अद्याप त्यासंदर्भात विभागाचे कार्यवाही केली नाही. परिणामी कर्मचारी अद्याप तोकड्या मानधनावरच काम करीत आहेत. तुटपुंज्या वेतनावर त्यांना जीवन जगावे लागत आहे. मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात साथीच्या आजारांनी मृत्यूला कवटाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच जणांचा हिवतापाने मृत्यू होतो. शासन यावर आळा घालण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे रोगांवर आळा घालण्यात विभागाला सातत्याने अपयश येत आहे.साथीच्या आजारांत कीटकजन्य आजारांवर आळा घालण्याकरिता फवारणी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. मग १५ वर्षापासून कार्यरत ७९ कर्मचारी घरोघरी जाऊन फवारणी करतात. त्यांना मानधन म्हणून १९१ आणि २३० रुपये मोबदला दिला जातो. गोंदिया तालुक्यात २३, आमगाव २७, अर्जुनी मोरगाव ४, देवरीत ८, गोरेगावात ६ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना स्थायी करण्याची मागणी जोर धरत आहे. मागणीवर सकारात्मक भूमिका घेत शासनाने २८ आॅक्टोबर २०१३ रोजी सर्व सफाई कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यात फवारणीच्या कामावर असलेले कामगार फक्त सातवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले असल्याच्या कारणावरुन त्यांना अद्याप कायम करण्यात आले नाही. आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचविणाऱ्यांची कीव येथील जिल्हा हिवताप विभागाला अद्याप तरी आली नाही. यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांना विचारले असता फवारणी कामगार दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले नसल्याने कायम करण्यात अडचण येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षणाच्या अटीमुळे कामगारांना रोजंदारीवरच जीवन काढावे लागणार काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय सहावा वेतन आयोग, सेवानिवृत्ती आदी प्रश्न देखील प्रलंबित आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर याकडे ते हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे फवारणी कामगार अडचणीत आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)