शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लहान राज्यांना किमान ४० दिवसांचे अधिवेशन

By admin | Updated: October 15, 2014 01:33 IST

पणजी : लहान राज्यांच्या विधानसभांचे अधिवेशन वर्षाला किमान ४० दिवस आणि मोठ्या राज्यांचे ७० दिवस, तर संसदेचे १०० दिवस अधिवेशन असावे,

पणजी : लहान राज्यांच्या विधानसभांचे अधिवेशन वर्षाला किमान ४० दिवस आणि मोठ्या राज्यांचे ७० दिवस, तर संसदेचे १०० दिवस अधिवेशन असावे, अशी सूचना केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री व्यंकय्या नायडू यांनी येथे झालेल्या ‘व्हिप’ परिषदेत केली. अधिवेशनाचे दिवस कमी होणे, कामकाज तहकूब करण्याची वेळ येणे, संसदेचे कामकाज कमी होणे या बाबी लोकशाहीसाठी चिंतेच्या असल्याचे नायडू यांनी सांगितले. राजकारण्यांच्या गुन्हेगारीमुळे संसदेची विश्वासार्हर्ता कमी झाल्याचे मतही नायडू यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधींमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी, पैशांचा वापर व त्यांची वागणूक यामुळे संसदेची पत खालावत आहे. त्याला संसदेबरोबरच राज्य विधिमंडळही अपवाद नाही, असे नायडू यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींच्या कामगिरीबद्दलही लोक समाधानी नाहीत, असे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींची प्रतिमा जनमानसामध्ये चांगली नाही, ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभीर्यपूर्वक काम करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून काही चांगल्या गोष्टींना सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)