शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा गोव्यातही हवा

By admin | Updated: June 30, 2014 02:10 IST

श्याम मानव यांचे मत : पणजीत समविचारी कार्यकर्त्यांची बैठक

पणजी : अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा कायदा गोव्यातही अमलात यावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे बैठक घेण्यात आली. अंनिसचे संस्थापक आणि संयोजक श्याम मानव यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा कायदा गोव्यात व्हावा या दिशेने तर्कशुद्ध पद्धतीने विचार व ताकदीने लढा दिल्यास हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो, असे सांगितले. तसेच असा कायदा जगाच्या पाठीवर कोठेही झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. अज्ञानातून केल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा कायदा गरजेचा आहे. तसेच सर्वसामान्य लोकांचे शोषण करून त्याद्वारे समाजाची घडी विस्कटून टाकण्याच्या हेतूने भोंदू लोकांनी केलेला प्रयत्न हाणून पाडण्याच्या दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा कसा ठरतो, हे या बैठकीत श्याम मानव यांनी नमूद केले. यात एक अदिनियम असा आहे की नरबळी, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समूळ उच्चाटन करणे, अशा अपराधासाठी दोषी व्यक्तींना शिक्षेची तरतूद आहे. जादूटोणा करणाऱ्या आणि भोंदू लोकांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडण्यापासून सर्वसामान्य लोकांना वाचविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रयत्न चालले आहेत. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारची अनिष्ट कृती करणे, तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करत त्याद्वारे फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे, करणी, भानामती, जारणमारण यांच्या नावाने अमानुष कृत्ये करणे, मानसिक विकलांग व्यक्तीस अमानवी व्यक्ती असल्याचे भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तींची लुबाडणूक करणे, मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्ती उसल्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हे सर्व बंद करण्यासाठी हे विधेयक गोव्यात येणे का आवश्यक आहे याविषयी चर्चा करण्यात आली. रमेश गावस यांनी मानव यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यज्ञेश्वर निगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)