शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:25 IST

आईच्या पालनपोषणात मोठा झालेला स्वप्निल आता २२ वर्षांचा झाला होता. त्यामुळे स्वप्निलच्या आईला त्याचा मोठा आधार होता. तो शेतमजुरी ...

आईच्या पालनपोषणात मोठा झालेला स्वप्निल आता २२ वर्षांचा झाला होता. त्यामुळे स्वप्निलच्या आईला त्याचा मोठा आधार होता. तो शेतमजुरी करून घरखर्च सांभाळू लागला होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते, शेतातील मोटारपंप सुरू करण्याचे निमित्त झाले आणि त्याचवेळी विजेचा जोरात झटका लागून तो खाली कोसळला. त्याला लगेच रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण डॉ.सय्याम यांनी तपासणी करून मृत घोषित केले. धानोरा येथे शवविच्छेदन केल्यानंतर संध्याकाळी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्निलच्या अचानक जाण्याने रांगी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

(बॉक्स)

पतीची आत्महत्या, मुलाचा अपघाती मृत्यू

स्वप्निलच्या घरात तो एकमेव पुरुष होता. त्याच्या वडिलांनी तो लहान असतानाच आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली होती. त्यानंतर स्वप्निलची आई मंदा ज्ञानेश्वर वालदे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या पालनपोषणाचा भार एकट्या आईवर आल्याने त्यांनी शेतमजुरी करून दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मागील वर्षी मुलीचे थाटात लग्नसुद्धा लावून आपले कर्तव्य पार पाडले पण दु:खाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अनेक वर्षापूर्वी पतीने आत्महत्या केल्यानंतर आता तरुण मुलाचा अपघात मृत्यू झाल्याने मंदा वालदे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

090721\img-20210709-wa0006.jpg

विजेच्या धक्क्याने 22 वर्षीय युवकाचा मृत्यू*

कुटुंबाची जबाबदारी हाती येत नाही तर नियतीने मोडला डाव,