शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

येलचिल परिसरात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:26 IST

आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचिल व तोंदेल परिसर हा घनदाट जंगलाने व्याप्त आहे, शिवाय येथे पाण्याची व्यवस्था मुबलक आहे. आलापल्ली-एटापल्ली मार्गावर ...

आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचिल व तोंदेल परिसर हा घनदाट जंगलाने व्याप्त आहे, शिवाय येथे पाण्याची व्यवस्था मुबलक आहे. आलापल्ली-एटापल्ली मार्गावर दररोज शेकडो नागरिक व विद्यार्थी ये-जा करतात. एका दुचाकीस्वाराच्या मागे वाघ धावला असल्याचे त्याने गावकऱ्यांना सांगितले. तसेच बसमधून येताना शालेय विद्यार्थ्यांनाही वाघ दिसल्याची माहिती त्यांनी आपल्या पालकांना दिली. येलचिल गावातील एका शेतकऱ्याच्या बैलाला वाघाने ठार मारल्याची माहिती आहे. जंगलात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही वाघाच्या पायाचे ठसे दिसल्याची माहिती आहे. मात्र अद्याप वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये तो वाघ टिपल्या गेला नाही. वेलगूर परिसरातील नवेगावलगत शेतात वाघ बघितल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मात्र तो वाघ आहे की बिबट, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांनी शेतातील रात्रीची जागल साेडून घरीच झोपणे सुरू केले आहे. सध्या तरी कोणत्या इसमावर वाघाने हल्ला केला नाही. मात्र लोकांच्या मनात भीती पसरली आहे.

कोट...

वाघ दिसल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ट्रान्झिट काळामध्ये वाघ एकीकडून दुसरीकडे जात असतो. जंगलमार्गे तेलंगणा परिसरातून वाघ महाराष्ट्रात ये-जा करीत असतात. बिबटचा वावरही या परिसरात आहे. मात्र हा नेमका वाघ आहे की बिबट, हे आताच सांगता येणार नाही. वनविभागातर्फे कॅमेरे लावण्यात आले आहेत. अधिकृत माहिती नंतर देता येईल. वनरक्षक किंवा वनपालांनी अद्याप कोणती माहिती दिली नाही. बैलाला ठार केल्याची माहिती आमच्याकडे आली असून, पंचनामा करून चौकशी सुरू आहे.

- पी. आर. जवरे, वन परिक्षेत्राधिकारी, पीडीगुडम क्षेत्र.