शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उद्योग प्रकल्प सुरू करा

By admin | Updated: December 25, 2015 02:14 IST

अविकसित अतिदुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग स्थापन न झाल्याने जिल्ह्याचा विकास रखडला असून बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली आहे.

उद्योगमंत्र्यांकडे साकडे : सेना पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदनगडचिरोली : अविकसित अतिदुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग स्थापन न झाल्याने जिल्ह्याचा विकास रखडला असून बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात लोहपोलाद, सिमेंट तसेच इतर उद्योग प्रकल्प सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात शिवसेनेचे गडचिरोली उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात सेना पदाधिकाऱ्यांनी अधिवेशन काळात नागपूर येथे जाऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी मंत्रीमहोदय व सेनापदाधिकाऱ्यांमध्ये उद्योग निर्मितीबाबत सखोल चर्चा झाली. यावर उद्योगमंत्री देसाई यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या उद्योग प्रकल्पाबाबत मुंबईच्या मंत्रालयात लवकरच महत्त्वाची बैठक बोलावून तत्काळ निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सेना पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले. दिलेल्या निवेदनात सूरजागड येथे लोह प्रकल्प उभारण्यात यावा, देवलमरी येथे सिमेंट कारखाना सुरू करावा, वनोपजावर प्रक्रिया करणारे केंद्र स्थापन करण्यात यावे, मधसंकलन केंद्र उभारावे, एमआयडीसी क्षेत्राचा विकास करावा, एमआयडीसी क्षेत्रात उद्योग न उभारल्यामुळे रिकामे असलेले भूखंड शासनाने परत घेऊन ते बेरोजगारांना देण्यात यावे, खनिजाचे उत्खनन करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. भेटी दरम्यान शिवसेनेचे उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर बघमारे, विभाग प्रमुख गजानन नैताम, संदीप दुधबळे, गडचिरोली तालुका प्रमुख घनश्याम कोलते, दिलीप भोयर, राजू विरवार, यादव लोहंबरे, सुनील नक्षिणे, योगेश कुळवे, राहुल सोरते, देवेंद्र मोगरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.