शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

Maharashtra Election 2019 : १९९५ मध्ये ठरली होती सर्वाधिक अवैध मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:00 AM

१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका पेटीत टाकली जात होती. एकाच उमेदवाराला टाकलेले मत वैध ठरविले जाईल, असा निवडणूक विभागाचा नियम आहे.

ठळक मुद्देईव्हीएमनंतर घटले प्रमाण : विधानसभेसाठी पहिल्यांदाच होणार व्हीव्हीपॅटचा वापर

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २००० पूर्वीपर्यंत मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. त्यावेळी काही नागरिक दोनपेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करीत होते. असे मतदान अवैध ठरत होते. १९९५ च्या निवडणुकीत सुमारे ७ हजार १७५ तर १९९९ च्या निवडणुकीत ७ हजार १२८ मतदान अवैध ठरले होते.१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका पेटीत टाकली जात होती. एकाच उमेदवाराला टाकलेले मत वैध ठरविले जाईल, असा निवडणूक विभागाचा नियम आहे. मात्र काही मतदार एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करीत होते. त्यामुळे सदर मतदान अवैध ठरत होते. काही मतदार शिक्का न मारताच मतपत्रिका पेटीत टाकत होते तर काहींचा शिक्का व्यवस्थित उमटत नव्हता. काही वेळेला दोन निवडणूक चिन्हांच्या मध्ये शिक्का बसल्याने नेमके कुणाला मतदान झाले, हे स्पष्ट होत नव्हते. परिणामी सदर मतदान अवैध ठरविले जात होते. मतपत्रिकांचा वापर जोपर्यंत सुरू होता, तोपर्यंत अवैध मतांची संख्या अधिक होती. दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना मतदान कसे करावे, याबाबतही पुरेशी माहिती राहत नव्हती. परिणामी मते अवैध ठरण्याचे प्रमाण अधिक राहत होते.२००४ नंतर ईव्हीएमचा वापर सुरू झाला. ईव्हीएममध्ये एकदाच मतदान करण्याची मुभा आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये अवैध मते ठरत नाही. आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच होणार आहे. निवडणूक कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. पोस्टल मतदान सुद्धा मतपत्रिकेप्रमाणेच राहते. त्यामुळे सदर मतदान अवैध ठरण्याची शक्यता राहते. २००४ च्या निवडणुकीत १९ मतदान अवैध ठरले होते. २००९ मध्ये ४७ तर २०१४ च्या निवडणुकीत ३०१ मतदान अवैध ठरले होते.ईव्हीएममुळे अवैध मतांची समस्या सुटलीईव्हीएममध्ये मतदाराला एकदाच बटन दाबण्याची मुभा मिळते. त्यानंतर मशीन आपोआप लॉक होते. त्यामुळे तोे दुसऱ्यांदा बटन दाबू शकत नाही. दुसऱ्यांदा बटन दाबले तरी मशीन प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अवैध मते ठरत नाही. या मशीनचा कंट्रोलिंग मतदान केंद्राधिकाºयाकडे राहते. दुसरा मतदार आल्यानंतर मतदान केंद्राधिकारी त्याच्याकडे असलेली बटन दाबते. त्यानंतर दुसºया मतदाराला मतदान करता येते. ईव्हीएममुळे अवैध मतांची समस्या दूर झाली आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली