शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

100 किमीच्या प्रवासासाठी लागतात तब्बल चार तास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

चार वर्षांपूर्वी आलापल्ली ते सिरोंचा मार्गाची नव्याने बांधणी झाली. पण गेल्या दोन वर्षात झालेला अतिपाऊस आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची स्थिती खूपच गंभीर झाली आहे. आजारी नागरिक आणि गरोदर माता यांच्यासाठी या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.  सध्या महामार्ग प्राधीकरणाने या मार्गाची डागडुजी सुरू केली असली तरी या महामार्गाची पुनर्बांधणी करणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : गर्भवती महिलांसह रूग्णांना जीवघेणा त्रास

  विवेक बेझलवारलाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्ह्यात सध्या सर्वाधिक खराब आणि चर्चेचा विषय झालेला रस्ता म्हणजे आलापल्ली ते सिरोंचा हा आहे. या मार्गावरून जाताना हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे असे कोणाला सांगितले तर विश्वास बसणे कठीण आहे. या १००    किलोमीटरच्या मार्गात आता रस्ता कमी आणि खड्डेच जास्त असल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा हे जेमतेम दोन ते अडीच तासाचे अंतर पार करण्यासाठी सध्या ४ तास लागत आहेत. चार वर्षांपूर्वी आलापल्ली ते सिरोंचा मार्गाची नव्याने बांधणी झाली. पण गेल्या दोन वर्षात झालेला अतिपाऊस आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची स्थिती खूपच गंभीर झाली आहे. आजारी नागरिक आणि गरोदर माता यांच्यासाठी या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. सध्या महामार्ग प्राधीकरणाने या मार्गाची डागडुजी सुरू केली असली तरी या महामार्गाची पुनर्बांधणी करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी येत असलेल्या विविध अडचणी तातडीने दूर करण्यासाठी सर्व लाेकप्रतिनिधींनी सरकारदरबारी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आलापल्लीनंतर मोसमपासून पुढे ३५ किमी मार्गाच्या रुंदीकरण व पुनर्बांधणीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यापुढे सिरोंचापर्यंतच्या कामासाठीही प्रस्ताव गेला आहे. पण वन कायद्याच्या अडचणींमुळे हे काम सुरू झालेले नाही. या अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.- सारंग गोगटे, सहायक अभियंता, महामार्ग प्राधीकरण आलापल्ली

अवजड वाहनांचा प्रवासआलापल्ली-सिरोंचा मार्गावर छत्तीसगड आणि तेलंगाना राज्यासाठी तीन आंतरराज्यीय पूल निर्माण झाल्याने दक्षिणेकडून येणारी अवजड वाहने टोल टॅक्स वाचवण्यासाठी याच मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

पर्यटकांच्या भेटी मंदावल्याविदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलंगणातील कालेश्वर मंदिरात भाविकांची वर्षभर वर्दळ असते, परंतु महामार्गाच्या दुरवस्थेमुळे भाविकांसह कमलापूर हत्ती कॅम्प,  गिधाडांच्या विणीचे ठिकाण, सिरोंचाचे ब्रिटिशकालीन विश्रामगृह, वडधम जीवाष्म पार्क, सोमनूर संगमला येणारे पर्यटक ९० टक्क्यांनी कमी झाले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा