शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी सिरोंचासाठी ठरली नुकसानीचीच

By admin | Updated: May 12, 2016 01:34 IST

सिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असून या नद्यांचा सिंचनासाठी काहीही उपयोग झाला नाही.

गोदावरीने गडपली जमीनही : मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पालगतचाच भाग बाधितआनंद मांडवे सिरोंचासिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असून या नद्यांचा सिंचनासाठी काहीही उपयोग झाला नाही. उलट प्रत्येक पावसाळ्यात पुरामुळे कोट्यवधींच्या खरीप व रबी पिकांचे नुकसान झाले. शिवाय महापुराच्या तडाख्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन गोदावरीत गडप झाली. शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद असलेली जमीन प्रत्यक्षात मोक्यावर नाही. १९५८ मध्ये गोदावरी, प्राणहिताला प्रचंड पूर येऊन हजारो नागरिक विस्थापित झाले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८४६ मध्ये वसविलेल्या सिरोंचा, रयतवारी क्षेत्राचे नजीकच्या क्षेत्रात पुनर्वसन करण्यात आले. त्यासाठी झुडुपी जंगल कटाई करून आपदग्रस्तांना निवासी प्रयोजनार्थ भूखंडाचे वाटप करण्यात आले. सिरोंचा नगराचा भाग असलेले हे गाव सिरोंचा मालगुजारी (कोत्तागुडम) म्हणून सध्या अस्तित्वात आहे. १९८६ व १९८९ च्या महापुरानेही फार नुकसान झाले. यावेळी मद्दिकुंटा, आरडा, लंबडपल्ली, पेंटिपाका, तुमनुरसह अंकिसा-आसरअल्ली गावातील अनेकांचे पुनर्वसन झाले. १९९५ च्या महापुराने तालुक्यातील १४८ गावांपैकी १०३ गावे प्रभावित होऊन शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. आॅक्टोबर २००८ मध्ये विद्युत पुरवठा व सिंचनाअभावी कापूस पीक धोक्यात आले. कधी अवर्षणाने तर कधी अनियमित विद्युत पुरवठ्याने पीक धोक्यात आले असतांना तालुक्यातील बंधाऱ्यांनीही साथ दिली नाही. १९९५ मध्ये राजस्व निरीक्षण मंडळ सिरोंचा अंतर्गत १८९४ शेतकऱ्यांच्या १६७.७६ हेक्टर खरीप तर १६८६ हेक्टर रबी पिकांचे नुकसान झाले. आसरअल्ली सर्कलमधील ५३ गावातील २६८.०२ हेक्टर खरीप व २८७६ हेक्टर रबी पीक वाया गेले. २००८ व २००९ मध्येही पुराने शेतीचे नुकसान झाले. २०१० मध्ये संततधार पाऊस होऊन पुराने १४८ गावांपैकी ६८ गावांतील २ हजार ५६ हेक्टरमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. यात २२४० शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख ९४ हजार ८०० रूपयांचे नुकसान झाले. यातील सर्वाधिक बाधित क्षेत्र कापसाचे व आराजी १२१४ हेक्टर होती. त्या खालोखाल ७८७ हेक्टर धान पीक तर ५५ हेक्टर सोयाबिन पिकाला फटका बसला. यासह बामणी, टेकडाताला, पेंटीपाका येथीलही पिकांचे नुकसान झाले. पेंटीपाका मंडळातील १५१ शेतकऱ्यांचे नुकसान १४ लक्ष २१ हजारांचे झाले. आजतागायत आसरअल्ली सर्कलमधील ५८० हेक्टर ७५ आर शेतजमीन गोदावरीच्या पुराने खरडून गेली. यात आसरअल्लीची १८३.५० हेक्टर, अंकिसा माल १०५.८७ हेक्टर, अंकिसा चक येथील ६२.५०, सुंकरअल्लीची ९०, टेकडामोटला येथील ६६.७८ व मुत्तापूर माल येथील ७१ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. तत्कालीन जमिनदार व्यंकट मुरली मनोहर राव यांची आजतागायत तीन हजार एकर जमीन गोदावरीत गडप झाली, असे जाणकार सांगतात.या पार्श्वभूमीवर तालुका मुख्यालयालगतची धर्मपुरी उपसा सिंचन योजना ३० वर्षांपासून प्रलंबित असून रेगुंठा उपसा सिंचनही पूर्णत्वास आले नाही. ग्रामीण भागातील छोटे कास्तकार कर्जबाजारी झाले. बहुसंख्य ग्रामीण आदिवासींना उदरनिर्वाहासाठी स्थानांतरण करावे लागले. अशा विपरीत परिस्थितीत १९९१ मध्ये पेद्दी शंकरन्नाच्या रूपात येथे तत्कालीन पीपल्स वॉर ग्रुप या नक्षल संघटनेला आयते मैदान मिळाले. कालांतराने येथे नक्षलवाद वाढीस लागला. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता ठेकेदारांकडून लूट होऊ लागली. सिंचनाअभावी शेतजमीन पडीत ठेवणारा मोठा शेतकरीवर्ग येथे तयार झाला. कोर्ला, रमेशगुडम भागातील शेतकऱ्यांची जमीन इंद्रावतीच्या काठावर आहे. परंतु सिंचनाची सोय नाही. शेतकऱ्यांनी तेलंगणाच्या करिमनगर, वरंगल येथून बियाणे आणून भुईमूग व कापसाची शेती निसर्गाच्या भरवशावर सुरू केली आहे.