शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गावांत अंत्यसंस्कारासाठी लोकवर्गणीचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST

गावात एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत असतो. अशा अवस्थेत त्याच्या कौटुंबिक दुःखात गावकरी सहभागी ...

गावात एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत असतो. अशा अवस्थेत त्याच्या कौटुंबिक दुःखात गावकरी सहभागी होत गावातून लोकवर्गणी काढून त्याला आर्थिक हातभार देण्याचा प्रयत्न करीत असतात. गावातील मुख्य चौकात किवा वॉर्डात किवा मोहल्यात फिरून त्याची यादी तयार करून त्यात तांदूळ, डाळ, तिखट आदी स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य व पैसे गावकरी गोळा करीत असतात. काही गावात स्वयंपाक करून जेवण देत असतात, तर जमा झालेले पैसे तसेच तांदूळ, डाळ, तिखट आदी त्या मयत झालेल्या कुटुंबाला गावातील नागरिक पोहचवून असतात. गावातील चौकात गंज एकत्र दिसले की हमखास या गावातील कुणाचे तरी निधन झाले याचा अंदाज दिसून येतो.

अलीकडे माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. अशाही अवस्थेत दुःखाच्या सागरात बुडालेल्या कुटुंबाला आधार देत त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये या भावनेतून गावकरी हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवित आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा टिकून राहण्यास मदत झाली आहे