शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गावात वृक्ष संवर्धनाची लोकचळवळ निर्माण करा

By admin | Updated: June 24, 2016 01:57 IST

पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. औद्योगिकरणामुळे वाढलेले प्रदुषण लक्षात घेता वृक्ष लागवड करणे व त्यांचे संर्वधन करणे ही प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य मानले पाहिजे.

अनिल सोले यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत जनजागृती रॅलीगडचिरोली : पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. औद्योगिकरणामुळे वाढलेले प्रदुषण लक्षात घेता वृक्ष लागवड करणे व त्यांचे संर्वधन करणे ही प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य मानले पाहिजे. वृक्ष लागवड व संवर्धन ही लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने जनजागृती करावी, असे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले. उपवनसंरक्षक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने वृक्ष लागवडीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुरूवारी वृक्षदिंडी व रॅली काढण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आमदार प्रा. अनिल सोले बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, मुख्यवनसंरक्षक पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, रवींद्र ओल्लावार आदी मान्यवर उपस्थित होत. पुढे बोलताना आमदार सोले म्हणाले की, आपल्या राज्यात वनांचे आच्छादन १७ टक्के आहे. वास्तविक पाहता, जमिनीच्या किमान ते ३३ टक्के असायला पाहिजे. दिवसेंदिवस विविध कारणांमुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. परिणामी दुष्काळ, प्रदुषण, अकाली पाऊस, तसेच विविध आजारांना संमोर जावे लागत आहे. प्रत्येक जण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पाच कोटी रूपये मुल्याचे आॅक्सीजन ग्रहण करतो. या विनामुल्य मिळणाऱ्या आॅक्सीजनची परतफेड म्हणून त्याचबरोबर भावी पिढीला पुरेशा प्रमाणात आॅक्सीजन मिळावे यासाठी येत्या १ जुलैला प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन केले. संचालन प्रशांत खाडे, तर आभार सुनिल पेंदोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला कारमेल हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)