शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

१७९०० शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:24 IST

पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी १५ जुलै ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. याबाबत ...

पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी १५ जुलै ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. याबाबत सुरू करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसूचित खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के, नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे.

प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करताना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्यासह अग्रणी जिल्हा प्रबंधक युवराज टेंभुर्णे, उपविभागीय कृषी अधिकारी भाऊसाहेब कदम, गुण नियंत्रण अधिकारी संजय मेश्राम, तंत्र अधिकारी शीतल खोबरागडे, मंडळ कृषी अधिकारी चलकलवार उपस्थित होते.

(बॉक्स)

विमा संरक्षित रक्कम, हप्ता व पिकाचे नाव

तांदूळ (भात) पिकासाठी- विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर ३१,२५० रुपये व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर ६२५ रुपये इतका आहे.

सोयाबीन पिकासाठी- विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर ३४५०० रुपये असून, शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर ६९० रुपये इतका आहे

कापूस पिकासाठी - विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर रुपये ३५७५० रुपये असून, शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर १७८७.५० रुपये इतका आहे.

(बॉक्स)

केव्हा मिळू शकतो विम्याचा लाभ?

हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी किंवा लावणी न होणे, पिकांच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, यामध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूसंखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींचा समावेश आहे, तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीपश्चात होणारे पिकांचे नुकसान याचाही यात समावेश असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले.