शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचे प्रदर्शन नको !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 15:53 IST

तारुण्य आले की, प्रेमभावना मनात उमलते.

  -Ravindra More             तारुण्य आले की, प्रेमभावना मनात उमलते. म्हणतात की ‘प्रेम’ ही निसर्गाची देणगी आहे. इतिहास पाहिला तर प्रेमाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, कारण बऱ्याच ऐतिहासिक घटना ह्या प्रेमामुळेच घडलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या घटना अजूनही कोणी विसरू शकले नाही. पण बऱ्याचदा प्रेमभावनेचे एवढे प्रदर्शन केले जाते की, त्याचा सामान्य जनतेवर परिणाम जाणवतात. आजच्या सदरात खरी प्रेमभावना काय असते आणि त्याला कसे जपावे याबाबत जाणून घेऊया...बºयाचदा दोघांचे एकमेकांवर खरे प्रेम असूनही काही कारणाने एकमेकांशी भांडता, त्यावेळी आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत की नाही हे भानदेखील विसरतो. मात्र असे न करता सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला सभ्य लोकांसारखंच वागता आलं पाहिजे; किंबहुना तुम्ही सभ्यच वागले पाहिजे. आपण जे काही करतो, बोलतो त्याचा इतरांवर वाईट परिणाम तर होणार नाही ना, याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. भांडण तर सोडाच पण आपण बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रेमाचे असभ्य प्रदर्शन इतरांना घडवितो. शहरात रस्त्यारस्त्यावर आपण हातात हात घालून जोडीने फिरत असतो. परदेशी युवक-युवती तर खुलेआम अशा पद्धतीने फिरतच असतात; पण आपणही त्यांचे अंधानुकरण करीत त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवीत असभ्यतेचे धडे गिरवित असतो. इतरांनी बागांमध्ये जाऊन पाहिले तर त्यांना अशी काही दृश्ये पाहायला मिळतील, की त्यांना पैसे घालवून सिनेमा पाहण्याची गरजच पडणार नाही.   संस्कृतीचा विचार केला तर खरचं ही भारतीय संस्कृती आहे का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर सध्याचे चित्रपट व मालिका आहेत. आज या माध्यमातून दृश्ये ज्या पद्धतीने दाखविली जातात, त्याचा परिणाम आजच्या युवा पिढीवर होतोय. पुष्कळदा आपण मोबाईलवर बोलणारी जोडपी पाहातो. एकमेकांशी बोलणं, गप्पा मारणं यात गैर काहीच नाही. मात्र आज आपण जेवढा वेळ प्रेम गप्पा मारण्यासाठी देतो, तेवढा वेळ खरच कुटुंबासाठीही देतो का? याचा विचार व्हायला नको का? कारण एकत्र कुटुंब पद्धतीत अशा असभ्य घटनांना नक्कीच आळा बसतो.   आपण कसे वागत आहोत, याचा विचार आजच्या तरुणाईने नक्कीच करायला हवा. आपल्या बोलण्याचा, वागण्याचा समाजावर, कुटुंबावर काही विपरित परिणाम होत तर नाहीना याची काळजी नक्कीच घेतली गेली पाहिजे. पूर्वी लोक आपल्या वागण्यामुळं आपल्या कुटुंबावर, आपण राहतो त्या समाजावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काळजी घ्यायचे. पण आज असा विचार होताना दिसत नाही, हे खेदानं म्हणावं लागेल. आपण आपली भारतीय राहणीमान विसरुन पाश्चिमात्यांसारखे कपडे, त्यांची राहणीमान अंगीकारत आहोत. मात्र हे करीत असताना आपले वर्तन, विचार, संस्कार हे बदलणार नाहीत याचीही काळजी आजच्या तरुणाईने घेतली पाहिजे. मालिका, सिनेमामधून दाखविली जाणारी बीभत्स दृश्ये, प्रेमाचे हिडीस सादरीकरण, भावनांचा अतिरेक, कपड्यांचा तोकडेपणा हे सारं त्या-त्या माध्यमात ठीक वाटतं. पण खऱ्या आयुष्यात या सर्वांचं हिडीस प्रदर्शन, असभ्य वर्तन अशोभनीय ठरतं. शिवाय इतरांच्या मनावरही वाईट परिणाम करणारं ठरतं. म्हणूनच युवा पिढीनं, विशेष करून नवविवाहित जोडप्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. तारतम्य ठेवूनच समाजात, कुटुंबात वावरलं पाहिजे. असं वागणं तुमच्या आणि समाजाच्याही हिताचं ठरेल.