शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

अतुल सावे कोणा कोणाच्या घरी पाणी भरत आहेत ?

By सुधीर महाजन | Updated: April 30, 2019 15:46 IST

पाणी टंचाईला शिवसेनेइतकेच भाजप ही जबाबदार आहे याचा विसर मात्र भाजपला सोयीस्कर पडतो.

- सुधीर महाजन

सटाण्याला देव मामलेदारांचे मंदीर आहे; मामलेदार नावाचा देव म्हटल्यानंतर नावातच उत्सुकता खुण्या मारुती, कानफोडे हनुमान अशा नावांना सरावलेले आपले काम असतांनाही हे नाव कानावर पडले की वेगळेच वाटते. मामलेदार म्हणजे तहसीलदार. तहसीलदाराला लोक देव मानतात हे म्हणजे फारच झाले. तर या देव मामलेदारांनी बागलान परिसरात प्रचंड लोकोपयोगी काम केली. पाण्याचा प्रश्न सोडविला त्यांच्या अशा कामांनी जनतेने त्यांना देवत्त्व बहाल केले. त्यांचे मंदीर बांधले. त्याची दरवर्षी मोठी यात्रा भरते. सोयगाव या तालुक्याच्या गावानेही नाईक गुरूजींचे मंदीर बांधले. या शिक्षकाने आयुष्यभर ज्ञानदान आणि समाज कार्य केले. पाच वर्षापूर्वी निधनानंतर त्यांचे मंदीर गावाने बांधले. अशी उदाहरणे दुर्मीळ असतात आपले काम चाकोरीबाहेर जावून करणे व लोककल्याण साधने अशांनाच देवत्त्व प्राप्त होते. आज एक बातमी वाचतांना या दोघांची आवठवण झाली. देव मामलेदारांना मी पाहिलेले नाही. कारण ते ब्रिटिशांच्या काळात होते; परंतु नाईक गुरूजींना भेटलो आहे. आपण वेगळे काही करतो आहे असा अभिनिवेश नसलेला निर्मळ, साधा माणुस तुमच्या माझ्या घरातील आजोंबासारखा. 

तर या दोघांच्या आठवणीचे कारण एक बातमी होती. औरंगाबादमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. आठ-दहा दिवस पाणी मिळत नाही. सगळ्यांच्याच तोडचे पाणी पळाले आहे. जनतेच्या रोषामुळे लोकप्रतिनिधी तोंड लपवत आहेत. त्यांच्या नाकर्तेपणाची प्रतिती लोकांना पावला पावलावर येते तर पाण्याच्या टँकरसाठी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर एक जमाव गेलेला. आधिच उन्हाची काहिली आणि त्यात पाणी टंचाईची भर संतापलेल्या जमावाने येथे टँकर अडवले. तेवढ्यात एक टँकर रांग मोडून घुसला तो भाजपचे आमदार अतुल सावेंचा होता जनतेला पाणी पुरवठा करण्याच्या कल्याणकारी कामासाठी सावेंनी हा टँकर सुरू केला. मतदारांच्या काळजीचा उदात्त हेतु असावा असे तरी दिसत होते. लोकांनी तो अडवला. एकाने त्यातील रजिस्टर उघडून नावे तपासली तर म्हणजे या टँकरने पाणी देवून कोणाची सेवा बजावली हे तपासले आणि नावे वाचण्यास सुरूवात केली. तर यात विजया रहाटकर ज्या की माजी महापौर आणि आता महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. किशनचंद तनवाणी, स्वत: अतुल सावे अशी नावे बाहेर आली. आणखी वस्त्रहरण नको म्हणून समयसूचकता दाखवत सावे यांच्या टँकर चालकाने ते रजिस्टर हिसकावून घेत पोबारा केला. या कृतीतूनच आमदारांच्या समाजसेवेचे दर्शन घडले.

पाण्याच्या प्रश्नावर गेल्या महिन्यात भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलनाचा आव आणला होता. जो तो उठून आंदोलन करत आपण कसे समजासेवक, जनतेचे कैवारी आहोत याचे दर्शन घडवत होता. खरे तर शिवसेनेच्या गळ्यात गळा घालून ही मंडळी संत्तेत आहेत, सत्ताधारी आहेत; पण सत्ताधारीच आंदोलन करतात असे अभूतपूर्व दृश्य औरंगाबादकरांनी अनुभवले. पाणी टंचाईला शिवसेनेइतकेच भाजप ही जबाबदार आहे याचा विसर मात्र भाजपला सोयीस्कर पडतो. भ्रष्टाचारी माणूस भरपूर पैसे कमावतो व पाप क्षालनासाठी वर्षातून एकदा तिरुपतीला जावून हुंडीत काही रक्कम टाकून स्वत:चे समाधान करून घेतात, असा हा नगरसेवकांच्या आंदोलनाचा प्रकार आहे. त्यामुळे आपल्या पक्षांच्या सहकाऱ्यांच्या घरी अतुल सावे पाणी भरतात यात वावगे ते काय ही सर्व एकाच संस्कृतीची मंडळी आहेत हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. रोम जळत असतांना निरो गिटार वाजवत होता ही प्रपृत्ती अनादी काळापासूनची असल्याने वेगळे काहीच नाही. जनतेच्या तोंडचे पाणी काढून घेण्याचा प्रकार नवा नाही.

टॅग्स :Atul Saaveअतुल सावेwater scarcityपाणी टंचाईAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका