शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: पैसे कोठून आणणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 07:46 IST

महाराष्ट्राचा आर्थिक नकाशा असा टराटरा फाटलेला असताना, महाराष्ट्र धर्म पाळून सर्वांना विकासाची समान संधी वगैरे देण्याचे आश्वासन कोठे या जाहीरनाम्यात दिसतच नाही.

महाराष्ट्र विधानसभेच्या चौदाव्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाआघाडीने आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. महायुतीने त्याला संकल्पपत्र नाव दिले आहे, तर महाआघाडीने महाराष्ट्रनामा म्हटले आहे. दोन्ही जाहीरनामे वाचले तर मतदारांना वाटेल की, आपण निवडणूक निकालानंतर स्वर्गातच राहायला जाणार आहोत. महिला, शेतकरीवर्ग, वयोवृद्ध माणूस, बेरोजगार युवावर्ग, शिकणारी मुले-मुली, आदी कोणाचेही भले करायचे सोडलेले नाही.

महायुती आणि महाआघाडीतील सर्वच राजकीय पक्ष अलीकडच्या काळात सत्तेवर होतीच, तेव्हा या जादुई संकल्पना का सुचल्या नाहीत, असा प्रश्न सामान्य मतदारांना पडल्यावाचून राहिला नसेल. महाराष्ट्रातील सर्व पिके बंद करून पैसा देणारी शेती करण्याचा छुपा कार्यक्रम या दोन्ही जाहीरनाम्यांमागे असावा का, असादेखील प्रश्न उपस्थित होतो. इतक्या साऱ्यांचे जीवन सुखी, आनंदी आणि मोफत देऊन समृद्ध करणार असतील, तर त्यासाठी पैसा लागणार. हा पैसा देणारी शेती राज्यकर्ते करणार, असा दाट संशय येत आहे. महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ६२ हजार रुपये आहे. राष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न १ लाख ६९ हजार रुपये आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न कमी आहे आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या सरासरी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये चौदा जिल्हे मोडतात. याचाच दुसरा अर्थ आठ अतिश्रीमंत जिल्हे, चौदा मध्यमवर्गीय आणि चौदा जिल्हे दारिद्र्यरेषेच्या खाली असावेत, अशी स्थिती आहे. दुसऱ्या भाषेत एका महाराष्ट्रात तीन महाराष्ट्र नांदत आहेत. श्रीमंत अधिकच श्रीमंत होत आहेत, मुंबई, पुणे, ठाणे पट्टा हाच श्रीमंतांचा आणि तेथेच रोजगारनिर्मितीची कारखानदारी देखील आहे. नाशिक, कोल्हापूर, सांगली आदी पट्ट्यात जेमतेम जगण्याची सोय आहे आणि उर्वरित महाराष्ट्र रोजच्या भाकरीसाठी झगडतो आहे किंवा श्रीमंत मुंबई-ठाणे पट्ट्याचा आश्रित होत आहे. महाराष्ट्राचा आर्थिक नकाशा असा टराटरा फाटलेला असताना, महाराष्ट्र धर्म पाळून सर्वांना विकासाची समान संधी वगैरे देण्याचे आश्वासन कोठे या जाहीरनाम्यात दिसतच नाही. महिलांना पैसे वाटण्याची ईर्षाच लागली आहे. तुम्ही १५०० देता का? आम्ही दुप्पट देऊ! त्यांचे बालविवाह आजही होत आहेत. शिक्षणाच्या संधी सर्वांना मिळत नाहीत. चूल-मूल सोडून बाहेर पडावे, तर त्या घरी सुरक्षित परततील, याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढविणाऱ्या व्यवस्थेला हात न घालता ते कर्ज होऊ द्या, आम्ही माफ करू. चुकून कोणी भरलंच, तर त्याला नाराज न करता प्रोत्साहन म्हणून पैसे देऊ! नव्या पिढीच्या शिक्षणाचीदेखील तशीच व्यवस्था करण्याचा संकल्प दोन्ही जाहीरनाम्यांत पानोपानी दिसतो. दहा लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी प्रतिमहा दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. याची बेरीज आणि गुणाकार केला तर महाराष्ट्र राज्याची तिजोरी कायमची रिकामीच राहणार आहे. खासगीकरणाद्वारे शिक्षणाचा धंदा करून ठेवण्याचे धोरण आखून वंचितांची संख्या वाढवणाऱ्या याच दोन्ही आघाड्यांचे राज्यकर्ते गेल्या चार दशकांपासून कारभार करीत आहेत. आता शिक्षणच जनतेच्या आवाक्याच्या बाहेर जात आहे, असे वाटून पैसे वाटण्याचे धोरण जाहीर केले आहे. शेतमालाला भाव मिळत नाही आणि उत्पादन खर्च काही वाढायचे थांबत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत आहे. उत्पन्न आणि खर्चाच्या कचाट्यात तो सापडला आहे, म्हणून कर्ज फेडू शकत नाही. मात्र, त्यात दुरुस्ती न करता कर्जमाफीची घोषणा करण्याचा पर्याय निवडला जात आहे. कोणतीही समस्या कायमची सुटावी, यासाठी प्रयत्न करणारे एकही आश्वासन ना संकल्पपत्रात ना महाराष्ट्रनाम्यात !

युती आणि आघाडी अशीच आश्वासने देऊन सरकार स्थापन करणार असतील, तर ते सत्यात उतरणार आहे का? कारण ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी लाखो कोटी रुपये लागणार आहेत. महाराष्ट्राचे उत्पन्न आणि खर्च पाहता अनेक कामांसाठी कर्ज काढावे लागते. आताच महाराष्ट्रावर पावणेनऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्राचा विकासदर ७.३ टक्के असला, तरी त्यावर इतका मोठा कर्जाचा बोजा पेलवणार नाही. लाडक्या बहिणींसाठीच वर्षाला ४५ हजार कोटी रुपये लागणार आहेत. सरकारच्या कोणत्याही खात्याचे विकासकामावर इतके बजेट नसते. महाआघाडीने लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे देण्याचे आश्वासन महाराष्ट्रनाम्यात दिले आहे. या साऱ्या खर्चासाठी पैसे कोठून आणणार आहात, या प्रश्नाचे उत्तर ना संकल्पपत्रात आहे ना महाराष्ट्रनाम्यात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक 2024