शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: महाराष्ट्राचा नवा अभ्यासक्रम आराखडा निषेधार्हच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:03 IST

Maharashtra's New Syllabus: पश्चिमेतील वर्णभेद, गुलामी, शोषणावर बोलायचे; पण आपल्याकडची जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि महिलांच्या शोषणावर मौन बाळगायचे ?

- डॉ. सुखदेव थोरात(माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग)

२०२० च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र सरकारने अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला असला तरी महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी त्यावर आक्षेप घेतले आहेत. अभ्यासक्रमाच्या आराखड्यात प्रत्यक्ष काय शिकवायचे दिलेले नाही; परंतु अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत. अभ्यासक्रमाचा आराखडा शिक्षणाची उद्दिष्टे सूचित करत असतो. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय शिकवायचे हे सांगतो. बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञान तसेच रोजगारक्षमता वाढवणे, चांगले नागरिक घडवण्यासाठी तरुण पिढीमध्ये नैतिक मूल्ये बिंबवणे अशी उद्दिष्टे ठेवण्यात आलेली आहेत. मात्र ही उद्दिष्टे गाठण्यासाठी आराखडा काय शिकवायला सांगतो?

- इतर काही घटकांसोबत भारतीय ज्ञान परंपरा शिकवा असे त्यात म्हटले आहे. परंतु भारतीय पद्धतीनुसार वेद, पुराण, उपनिषद, मनुस्मृती आणि गीता ही तत्वज्ञानांची ब्राह्मणी परंपरा या आराखड्याला सुचवायची आहे. जैनिझम, बुद्धिझम, शिखीझम, लोकायत आणि इतर अनेक परंपरांकडे त्यात दुर्लक्ष करण्यात आले आहे. गीतेच्या कर्मसिद्धांताचा त्यात विशेषत्वाने उल्लेख येतो. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक १ ते २५ तिसरी ते पाचवीपर्यंत, २६ ते ५० सहावी ते आठवीपर्यंत शिकवावे असे प्रस्तावित आहे. नववी ते बारावीसाठी गीतेचा १२ वा अध्याय नेमण्यात आला आहे. ‘नॉलेज ट्रॅडिशन ॲण्ड प्रॅक्टिसेस ऑफ इंडिया’ या विषयात गुरुशिष्य परंपरा शिकवणे अभिप्रेत आहे. पुरोगामी महाराष्ट्र विद्यार्थ्यांना शिकवा असे प्रस्तावित असले तरीही त्यात केवळ मध्ययुगीन संत परंपरेचा समावेश आहे. एकोणिसाव्या शतकातील सुधारणा, फुले, रानडे, आंबेडकर, शिंदे यांचे कार्य वगळण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या व्यक्तींची नावेही कोठे दिसत नाहीत.

मूल्यशिक्षण हे एक उद्दिष्ट असून त्यात शांतता, समता, बंधुत्व, सर्वसमावेशकता, घटनेची तत्वे, लोकशाही अशा अनेक गोष्टी येतात. परंतु मूल्यसंकल्पना भारतीय ज्ञान परंपरेतून उचलण्यात आली आहे. त्यामुळे गीतेतील निष्कर्म सिद्धांत तेवढा शिकवला जाईल. पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मूल्य हे वेद, पुराणे, स्मृती, मनुस्मृती आणि उपनिषदातून घेण्यात आले आहे. मूल्यांविषयीचे प्रकरण मनुस्मृतीतील वचनाने सुरू होते. गीतेतील निष्कर्म सिद्धांत, फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहा असे सांगतो. त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना असा शिकवला जाईल की त्यांनी काम करावे पण (शिकत असताना) गुणांची आणि पुढे फळाची अपेक्षा ठेवू नये.

समता त्याग अहिंसा ही जैनिझम, बुद्धिझम आणि शिखीझममधील शिकवण मात्र पूर्णपणे दुर्लक्षिलेली आहे. समता, भेदभाव आणि दारिद्र्य या प्रश्नांविषयी विद्यार्थ्यांना जाणीव देणे हे एक उद्दिष्ट असले तरी अस्तित्वात असलेली जातिव्यवस्था, लिंग विषमता याविषयी मुलांना सांगणे टाळले आहे. एकंदर ३२७ पानांच्या अभ्यासक्रमात कुठेही जात किंवा अस्पृश्यतेचा उल्लेखही आलेला नाही हे अत्यंत धक्कादायक होय. शालेय विद्यार्थ्यांना नेमके काय सांगायचे आहे हे या खोटेपणातून स्पष्ट होते. जातिव्यवस्था ब्राह्मणांनी तयार केलेली नाही तर ती ब्रिटिश सरकारने आणली असे हा अभ्यासक्रम  म्हणतो  ब्रिटिशांनी जात जनगणना केली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या ‘रिडल्स ऑफ हिंदुइझम’ या पुस्तकात पुरावे दिले, की जातिव्यवस्था ब्राह्मणी समाजाची सामाजिक निर्मिती होती. वेद, पुराणे, उपनिषदे, स्मृती, गीता, रामायण आणि महाभारत अशा सर्व ब्राह्मणी साहित्याने तिचे समर्थनच केलेले आहे . भारतीय संस्कृती स्त्रियांचा मोठा आदर करते असे या अभ्यासक्रमाने खोटे सांगितले आहे. बालविवाह, सतीची प्रथा, महिलांवर होणारे अत्याचार या गोष्टी दुर्लक्षिल्या आहेत. पश्चिमी देशातील वर्णभेद, गुलामी, शोषण याविषयी हा अभ्यासक्रम बोलतो, पण आपली जातव्यवस्था,अस्पृश्यता आणि महिलांचे शोषण यावर मौन बाळगतो. उपरोल्लेखित मुद्दे लक्षात घेता हा अभ्यासक्रम अजिबात पुढे रेटला जाता कामा नये. त्यावर व्यापक चर्चा व्हायलाच हवी.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार