शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिकांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वांना नियम सारखेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 06:49 IST

विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यासाठी कोणत्याही विशेष विमानाची वा रेल्वेची सोय केली गेली नाही.

कोरोनाचा प्रसार होऊ नये, हे स्थलांतरित मजुरांना न जाऊ देण्याचे कारण होते. राज्यघटनेची पूर्तता करणे हा मुख्य न्यायाधीशांच्या प्रवासामागचा हेतू आहे; पण याहूनही विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यासाठी कोणत्याही विशेष विमानाची वा रेल्वेची सोय केली गेली नाही.
संपूर्ण जगात थैैमान घालणारा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करतानाही लहान -मोठा असा कोणताही भेदभाव न केला जाणे कौतुकास्पद आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वांना या नियमांचे सारखेच पालन करावे लागत आहे व त्रासही सारखाच सोसावा लागत आहे. मुंबई, मेघालय व ओडिशा या तीन उच्च न्यायालयांवर नेमलेल्या मुख्य न्यायाधीशांना पदाची शपथ घेण्यासाठी हजारो कि.मी.चा खडतर प्रवास रस्त्यांमार्गे करावा लागणे हे याचेच ताजे उदाहरण आहे. न्या. दीपांकर दत्ता कोलकाताहून २,१५९ कि.मी. मोटार चालवत मुंबईला आले. त्याचप्रमाणे न्या. विश्वनाथ सोमद्देर यांनाही अलाहाबाद ते शिलाँग हा १,३४० कि.मी.चा प्रवास रस्त्यानेच करावा लागला. योगायोग असा की, न्या. दत्ता व न्या. सोमद्देर हे दोघेही मूळचे कोलकाता उच्च न्यायालयातील आहेत व दोघांचीही २२ जून २००६ या एकाच दिवशी तेथे नेमणूक झाली होती. दोघांनाही मुख्य न्यायाधीश म्हणून बढतीही एकाच दिवशी मिळाली व ‘लॉकडाऊन’चा त्रासही सारखाच सोसावा लागला. तिसरे मुख्य न्यायाधीश न्या. मोहम्मद रफिक १,५३५ कि.मी.चा प्रवास मोटारीने करून शिलाँगहून भुवनेश्वरला गेले. यापैकी मेघालयचे मुख्य न्यायाधीशपद हे बहुधा कोणालाच नकोसे असलेले पद असावे असे वाटते. तेथील आधीचे मुख्य न्यायाधीश न्या. ए. के. मित्तल यांची गेल्यावर्षी मध्यप्रदेशला बदली झाल्यावर मूळच्या मुंबईच्या असलेल्या न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांना मद्रासहून त्यांच्या जागी नेमले गेले; परंतु मद्रासच्या तुलनेत मेघालय उच्च न्यायालय खूपच लहान असल्याने शिलाँगला न जाता न्या. ताहिलरामाणी यांनी राजीनामा दिला. मग मेघालयमध्ये न्या. रफिक यांना पाठविले गेले. पण त्यांनाही ते पद नकोसे झाल्याने त्यांना आता तेथून ओडिशाला पाठवून त्यांच्याजागी न्या. सोमद्देर यांना पाठविले गेले. मिळालेले पद आवडो वा ना आवडो राष्ट्रपतींनी एकदा नियुक्तीचा आदेश काढल्यावर या तिघांनाही नव्या पदांवर रूजू होणे भाग होते. मुख्य न्यायाधीश असल्याने वाटेत तिघांचीही सरकारी डाक बंगल्यांवर निवास आणि आरामाची सोय केली गेली असणार हे जरी गृहित धरले तरी वाटेत कुठेही काही मिळण्याची सोय नसताना मोटारीत अवघडलेल्या अवस्थेत बसून ४०-४५ तास प्रवास करणे हे नक्कीच त्रासदायक आहे.


खासकरून न्या. दत्ता यांचे विशेष कौतुक वाटते. इतर दोघांप्रमाणे सोबत सरकारी चालक न घेता त्यांनी व त्यांच्या मुलाने आलटून-पालटून मोटार चालवत हा प्रवास पूर्ण केला. ‘लॉकडाऊन’ नसते तर हे तिघेही मुख्य न्यायाधीश विमानाने भुर्रकन काही तासांत इच्छितस्थळी पोहोचले असते व त्यांच्या या साहसी वाटाव्या अशा प्रवासाची चर्चाही झाली नसती. विमानाने न आल्याने त्यांना वाटेत पाच-सहा राज्यांमधील निसर्गाची निरनिराळी रूपे पाहता आली. देशातील विविधतेचा अनुभव घेता आला, ही यातील म्हटले तर जमेची बाजू आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हेही विमाने बंद झाल्याने गेल्या ९ मार्चपासून अमेरिकेत अडकून पडले आहेत. ते तेथून व्हिडिओ लिंकने आयोगाचे काम करत आहेत. ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यावर विविध राज्यांतून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे शेकडो कि.मी. चालत सहकुटुंब घराकडे निघाल्याचे चित्र पाहून देश हळहळला होता. ती हळहळ अवाजवी नक्कीच नव्हती; पण या मुख्य न्यायाधीशांच्या प्रवासाच्या बातम्या वाचल्यावर काही तिरकस मंडळींनी नाके मुरडली. त्यांचे म्हणणे असे की, जो तो आपापल्या ऐपतीनुसार प्रवास करतो. सरकारने स्थलांतरित मजुरांना जाऊ दिले नाही;


पण या मुख्य न्यायाधीशांच्या मोटार प्रवासाची सोय केली. मात्र, यातील फरक लक्षात घ्यायला हवा. कोरोनाचा प्रसार होऊ नये, हे स्थलांतरित मजुरांना न जाऊ देण्याचे कारण होते, तर राज्यघटनेची पूर्तता करणे हा मुख्य न्यायाधीशांच्या प्रवासामागचा हेतू आहे. विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या उच्चपदांकडे पाहून त्यांच्यासाठी विशेष विमानाची अथवा रेल्वेची सोय केली गेली नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस