शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मनवा बेपरवाह

By admin | Updated: August 1, 2016 05:17 IST

माणसाचा मोह मेला नाही. माया मेली नाही आणि मनही

माया मरी ना मन मरा, मर मर गये शरीरआशा त्रिरणा ना मरी, कह गये दास कबीरमाणसाचा मोह मेला नाही. माया मेली नाही आणि मनही. शरीर मरून जातं, पण जाईपर्यंत आशा, तृष्णा संपत नाही. मन मारून एखादी गोष्ट करणं म्हणजे काय तर मनातले विकार, भावना, लोभ, मोह, मद, मत्सर जाऊन तिथे असीम अथांगता निर्मळता प्रकट करणं हे महत्त्वाचं. आपलं पूर्ण आयुष्य हे मनोविकार सांभाळण्यात आणि जोपासण्यात, जोजविण्यात जाते. मन क्षुद्र जड वस्तूत अडकून पडतं. त्यातून मुक्ती नाही.माझा कोकणमधला एक मित्र म्हणाला, आमच्याकडे श्रीमंती दोन गोष्टींनी मोजतात. एक आंबे म्हणजे हापूस आंब्याची झाडं किती, आणि दुसरं म्हणजे कोर्ट केसेस किती? मी अचंबित झालो. तुझ्या आंब्याची एक फांदी माझ्या बांधाच्या आत आली, माझा आंबा तुझ्या अंगणात पडला इथपासून तुझ्यामुळे माझा वारा पाऊस अडतो म्हणणारे आहेत. मग आपण गुंततो कशात? माणसात, शरीरात की मनात? हे मन ऐहिक गोष्टीत फार पटकन गुंततं, गुंतून पडतं पण त्यातून पटकन बाहेर पडत नाही. म्हणून कबीर म्हणतो,चाह गयी चिंता मिटी, मनवा बेपरवाहजिनको कछु ना चाहिए, वो ही शहेनशाह!हे चाह जाणं आणि चिंता मिटणं महत्त्वाचं. त्याकरिता मनवा बेपरवाह हवं. म्हणजे बेछूट नाही तर अशा लौकिक गोष्टींची चिंता त्याने करू नये. कारण हे शाश्वत नाही म्हणून त्याबाबत बेपर्वा हवं आणि असं मन बेफिकीर झालं की माणूस शहेनशाह होतो. पण शहेनशाह होणं म्हणजे इच्छाहीन होणं, त्यांच्या पार जाणं. मला काहीही नको म्हणायला धैर्य लागतंं. नाही तर आपल्याकडे बहुतेक सगळे ‘आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून येईल घरा’ अशा प्रवृत्तीचेच असतात. पूर्वी काशीला जाणारा माणूस आपलं तर्पण करूनच जायचा. परत येण्याची शाश्वती नाही. आला तर पुण्यकर्म. इतकी विरक्ती अंगी येण्याला साधूच बनण्याची गरज नाही.साधुत्व ही वृत्ती आहे. साधू होणं म्हणजे सर्वसंगपरित्याग करणं. पण हे करायचं कसं? तर केवळ भगवी वस्त्र परिधान करून नाही, तर मन भगवं करणं. म्हणजे वासनाहीन होणं. पदाचा, पैशाचा, सत्तेचा कुठलाच लोभ न ठेवणं, त्यापासून पूर्ण निरासक्त होणं म्हणजे साधू होणं. अशा साधूला मठ, संस्था, अखाडा नसतो. कुंभमेळ्यात कुणी प्रथम स्नान करायचे यावरून दंगा करणारे साधू हे संधिसाधू होत. त्यांनी कशापासूनच विरक्ती घेतलेली नाही. म्हणायला संसार नाही, बायकोपोरं नाहीत पण वांच्छा तर इतकी आहे की संसारी माणूस परवडला. अशा व्यक्ती कशा होतील शहेनशाह? त्याला सडा फटिंग कबीर हवा. कबीरा खडा बाजारमें लिये लुकाठी हाथजो घर फूंके अपना चले हमारे साथ!कबीर बोलवतोय खरा, पण घर फुंकण्याचं धाडस आहे आपल्यात? कबीर बाजारात उभा आहे, आपली वाट पाहात !-किशोर पाठक