शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

सण-उत्सव हे सामाजिक सौंदर्याचे प्रतीक

By विजय दर्डा | Published: October 07, 2019 5:20 AM

वैभव, विद्या व विचारांनी तुम्ही परिपूर्ण व्हावे व तुमचे जीवन मंगलमय होवो.

- विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)सर्वप्रथम तुम्हा सर्वांना देवीच्या आराधनेचे महापर्व असलेल्या नवरात्रीच्या व वाईटावर चांगल्याचा नेहमीच विजय होतो हा संदेश देणाऱ्या दसºयाच्या मनापासून शुभेच्छा. तुमचे जीवन प्रत्येक प्राकृतिक शक्तीने परिपूर्ण व्हावे, तुम्ही सन्मार्गाची कास धरावी, अशा सदिच्छा. देशातील सर्वमान्य व्यक्ती बलवान झाली तर देशाचीही शक्ती वाढेल. प्रत्येकाने सन्मार्गाचा अवलंब केला तर वाईट गोष्टींचे पारिपत्य करणे शक्य होईल. देश विकासाच्या मार्गावर आणखी वेगाने वाटचाल करेल.

बदलत्या काळानुसार या सण-उत्सवांचा झगमगाट नक्कीच वाढला आहे. परंतु भक्तीचे मूळ स्वरूप व त्यातून मिळणारा संदेश तोच कायम आहे. ईश्वराच्या खालोखाल माता पूज्य आहे. कारण आपल्याच एका अंशातून नव्या जीवाचे सृजन करण्याची जबाबदारी परमेश्वराने तिच्यावर सोपविली आहे. त्या जगत्नियंत्याला प्रत्यक्षात कोणी पाहिलेले नाही. पण त्याची प्र्रतिनिधी असलेली आई आपण पाहिलेली असते. मातेची तुलना दुसºया कोणाशीही होऊ शकत नाही! म्हणूनच ख्यातनाम हिंदी कवी ओम व्यास ओम यांनी लिहिले आहे :मां पृथ्वी है, जगत है, धुरी हैमां बिनाइस सृष्टि की कल्पना अधूरी है.

महालक्ष्मी, महासरस्वती व दुर्गामातेच्या आराधनेतून हाच संदेश मिळतो की, जीवनात धन-धान्य व वैभवाएवढेच विद्या व पावित्र्याला महत्त्व आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात याचा आपण कधी विचार करतो? खरं तर श्रीरामांनी माणसामाणसांत कधी धर्म, जातीचा भेदभाव केला नाही. त्यामुळे आपण तसा भेदभाव करणे ही श्रीरामांची खरी भक्ती होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. सर्वांचेच रक्त लाल आहे व सर्वजण एकसारखे आहेत. सर्व धर्म एकतेचा संदेश देतात. राष्ट्राचा विचार एकतेचाच आहे व तो श्रेष्ठ आहे. आपला तिरंगा राष्ट्रध्वज हे बंधुभावाचे प्रतीक आहे. प्रभू रामांचा उत्सव साजरा केल्याने श्रीराम प्रसन्न होणार नाहीत, हे समजून घ्यायला हवे.

ज्यांच्यावर राष्ट्राची जबाबदारी आहे त्यांनी तर हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे. आपल्यालाही श्रीरामांसारखे व्हायचे असेल तर त्याच्याप्रमाणे आचरण करावे लागेल. नवरात्रीमध्ये नऊ कुमारिकांची पूजा करण्याची व त्यांना जेवू घालण्याची परंपरा आहे. याला कन्यापूजन म्हणतात. मुलींना आदराने वागविण्याचा संदेश देण्यासाठीच ही परंपरा रूढ झाली. परंतु दुर्दैवाने ही भावना कमी होताना दिसते. आजही देशाच्या अनेक भागांत व अनेक कुटुंबांत मुलींना भेदभावाची वागणूक मिळते. ही अनिष्ट सामाजिक वागणूक दूर करण्यासाठी केल्या जाणाºया प्रयत्नांत आपण सक्रिय सहभागी व्हायला हवे. मुलींचा आदर करणे ही आपली संस्कृतीच आहे. परंतु काळाच्या ओघात वाईट गोष्टींचा पडलेला प्रभाव नष्ट करावाच लागेल. तरच नवरात्रीची आराधना सार्थकी लागली, असे म्हणता येईल.

आपण आपल्या थोर संस्कृतीचा डंका पिटतो, पण ही संस्कृती आपल्याला नेमके काय शिकविते हे समजून घ्यायला हवे. आपण पर्युषण पर्व साजरे करतो. गणेशोत्सव, महालक्ष्मी, नवरात्री, दसरा, दिवाळी, बुद्ध पौर्णिमा, ओणम, ईद, नाताळ आणि गुरु नानकदेवांचे प्रकाशपर्व हे सर्व सण व उत्सव आपल्याला एक नवी दृष्टी, नवा विचार देत असतात. सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्यासाठी नाहीत. आपली चेतना जागृत करण्याचे, विचार श्रेष्ठ बनविण्याचे ते एक माध्यम आहे. शिवाय आपल्या सण-उत्सवांतून एक खास सामाजिक संदेशही मिळतो. आपण सण साजरा करतो तेव्हा सर्व कुटुंब एकत्र येते, समाज एकत्र येतो. आपल्यात अधिक जवळीक निर्माण होते. सर्वांनी मिळून आनंद साजरा केल्याने दु:खही वाटून घेण्याची भावना आपोआप निर्माण होते! एवढेच नव्हे या सण-उत्सवांचा एक आर्थिक पैलूही आहे. आनंदाच्या निमित्ताने सर्व लोक आपापल्या ऐपतीनुसार खर्च करतात, तो करता यावा यासाठी कष्टही करतात. यातूनच बाजारपेठांना बळकटी मिळते.

सध्या मी बडोद्यात आहे. गरबा ऐक्य व एकात्मतेचे कसे प्रतीक बनले आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. सुदैवाने येथे ‘युनायटेड वे’च्या गरबा कार्यक्रमात मला सहभागी होता आले. मातेच्या पूजनाची संधी मिळाली. येथे ४० हजार लोक एकाच वेळी गरबा खेळत आहेत. १५ ते २० हजार लोक प्रेक्षक म्हणून पाहत आहेत. अशा प्रकारे ८० हजार हात-पाय रंगीबेरंगी पोशाख परिधान करून मातेच्या भक्तीच्या तालावर गरबा करतात तेव्हा राष्ट्रीय ऐक्याचे एक अनोखे दर्शन होते. हाच आपला आशेचा किरण आहे. जगात असे अद्भुत दृश्य दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार!

तात्पर्य असे की, जीवनात सण-उत्सवांचे खूप महत्त्व आहे. ते नसतील तर जीवन नीरस होईल. आपल्याएवढे सण-उत्सव अन्य कोणत्याही देशात नाहीत, याचा खरं तर आपल्याला अभिमान वाटायला हवा. या दृष्टीने आपण जगात सर्वात भाग्यवान आहोत. पुन्हा एकदा दसºयाच्या भरपूर शुभेच्छा. वैभव, विद्या व विचारांनी तुम्ही परिपूर्ण व्हावे व तुमचे जीवन मंगलमय होवो.

 

टॅग्स :Navratriनवरात्री