शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 07:51 IST

देश प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे, असे चित्र उभे केले जात असताना देशाच्या चलनाचे मूल्य मात्र दिवसेंदिवस घसरत असेल तर हा विरोधाभास अगदी सामान्यांच्याही लक्षात येण्याजोगा आहे. निर्यातीला फायदा, पर्यटन व्यवसायाला चालना वगैरे फायदे समाजातील एका विशिष्ट वर्गांना मिळतात आणि रुपयाच्या घसरगुंडीचा तोटा मात्र सर्वसामान्यांना होतो.

रुपयाने डॉलर्सच्या तुलनेत नव्वदी पार केल्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. पहिली-आशिया खंडातील सर्वांत कमकुवत चलन अशी नामुष्की रुपयावर ओढवली. दुसरी-मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदचे अंशकालीन सदस्य नीलेश शाह म्हणतात की, चलनाची ही घसरण सरकारसाठी चिंतेची बाब नाही. ही सामान्य बाब आहे. या दोन्हींचा एकत्रित विचार करता दिसते की, राजकीय टीका टाळण्यासाठी सरकार स्थिती सामान्य आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. 

डॉलर्स बलवान झाल्यामुळे निर्यातीमधून अधिक परकीय चलन मिळेल, वगैरे फायदेही सोयीस्करीत्या सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात ही चिंतेची बाब आहेच. कारण, प्रगत देशांच्या तुलनेत भारताचा विकासदर वेगाने वाढत आहे, पायाभूत सोयीसुविधांची उभारणी होत आहे, देश प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे, असे चित्र उभे केले जात असताना देशाच्या चलनाचे मूल्य मात्र दिवसेंदिवस घसरत असेल तर हा विरोधाभास अगदी सामान्यांच्याही लक्षात येण्याजोगा आहे. निर्यातीला फायदा, पर्यटन व्यवसायाला चालना वगैरे फायदे समाजातील एका विशिष्ट वर्गांना मिळतात आणि रुपयाच्या घसरगुंडीचा तोटा मात्र सर्वसामान्यांना होतो, हा या विरोधाभासातील महत्त्वाचा फरक आहे. 

आपला देश इंधनांपासून खाद्यतेलापर्यंत आणि सोने-चांदीपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू व इलेक्ट्रिक-इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी कच्चा मालासाठी आयातीवर अवलंबून आहे. रुपया घसरला की या आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. साहजिकच हा आयात माल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याचे दर वाढलेले असतात. रुपयाच्या घसरणीचा पहिला परिणाम असतो अधिक महागाई. त्याशिवाय, परदेशात दर्जेदार शिक्षण घेण्याची कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या मुला-मुलींची स्वप्ने रुपया-डॉलर्सच्या विनिमय दरावर अवलंबून असतात. 

याशिवाय महत्त्वाचे हे की, चलनाचे अवमूल्यन हा केवळ आर्थिक व्यवहार नसतो. देशाची सर्वच क्षेत्रातील धोरणे, विशेषत: राजकीय स्थैर्य, शांतता, कायदा-सुव्यवस्था, त्यामुळे आकर्षित होणारी विदेशी म्हणजे डॉलर्स किंवा युरो-पौंडामधील गुंतवणूक, त्यातून होणारी रोजगार निर्मिती, या सगळ्यांचे सामाजिक-आर्थिक परिणाम अशा विविधांगी कारणांनी त्या त्या देशाच्या चलनाची वृद्धी किंवा अवमूल्यन होते. याशिवाय अमेरिकेतील गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळत असेल आणि भारतातील गुंतवणूक पुरेशा प्रमाणात सुरक्षित नसेल तर गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेतात. हेदेखील रुपयाच्या घसरणीचे एक महत्त्वाचे कारण आहे. 

अमेरिकेने भारतीय मालावर लावलेले दामदुप्पट टॅरिफ आणि रखडलेला भारत-अमेरिका व्यापार करार, ही रुपयाच्या घसरणीची ताजी कारणे आहेत. सोबतच सरकारचा आर्थिक विषयांवर धरसोड वृत्ती, निर्णयांमधील गोंधळ किंवा निर्नायकी, वित्तीय बेशिस्त ही कारणे असतातच. हे असे एकाहून अधिक मुद्दे रुपयाच्या स्थितीसाठी कारणीभूत असल्याने संयुक्त पुरोगामी सरकार सत्तेवर असताना तेव्हाचा विरोधी म्हणजे आताचा सत्ताधारी पक्ष रुपयाची किंमत घसरणे म्हणजे सरकारची पत घसरणे आहे अशी टीका करीत होता. जनतेलाही ते पटत होते. 

भाजपचे सरकार सत्तेवर आले तेव्हा साधारणपणे डॉलरच्या तुलनेत साठ रुपये असा दर असलेला रुपया आता ९० च्या पुढे गेल्यानंतर साहजिकच काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याविषयीची जुनी भाषणे सोशल मीडियावर टाकून टीका करीत आहेत. संपुआ सत्ताकाळात रुपया ‘सीनिअर सिटिझन’ असेल तर तो आता ‘सुपर सीनिअर सिटिझन’ झाला, हा या टीकेचा सूर आहे. यातील राजकारण बाजूला ठेवले तरी रुपयाची घसरण थांबविण्यासाठी किंबहुना तो मजबूत करण्यासाठी काही दीर्घकालीन उपाय योजने गरजेचे आहेत. 

रुपया नव्वदीपार गेल्यामुळे सरकारची झोप उडाली नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ती उडायला हवी. कारण, महागाईने कंबरडे मोडलेल्या सामान्यांना केवळ घोषणा आणि त्यांच्या प्रचाराने दिलासा मिळत नाही. मागच्या सरकारांना दोष देऊन आताच्या सरकारच्या उणिवा लपून राहत नाहीत. वित्तीय शिस्त, औद्योगिक उत्पादनावर भर, तेलाच्या निर्यातीला पर्याय अशा उपाययोजना करून ही घसरण थांबवायला हवी. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामाजिक व धार्मिक सौहार्द, सीमेवर व सीमेच्या आत शांतता यावरही लक्ष द्यायला हवे. जेणेकरून गुंतवणूकदारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास वाढेल. रुपया बलवान होईल. सरकारची पत वाढेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Rupee at 90: Government must wake up to economic realities.

Web Summary : Rupee's fall impacts common people through inflation and education costs. Beyond economics, political stability and investor confidence are crucial. Government needs long-term solutions, not just blame games, focusing on fiscal discipline and social harmony to strengthen the rupee.
टॅग्स :Indian Currencyभारतीय चलनAmericaअमेरिकाInflationमहागाईTrade Tariff Warटॅरिफ युद्ध