शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

संपादकीय: वो सुबह जरूर आएगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 6:29 AM

कोरोनाने व्यक्ती ते समष्टी असा जगण्याचा सगळा पट बदलून टाकला. दैनंदिनी, खाणेपिणे, आहार-विहार, सवयी, उपजीविका, इतकेच कशाला मानवी नातेसंबंध, कुटुंब, समाज वगैरेचा फेरविचार करायला लावला, हे अधिक महत्त्वाचे.

कोविड नावाच्या श्वास गुदमरून जीव घेणारा महाभयंकर विषाणू आढळल्याच्या, लागण झालेला पहिली व्यक्ती निष्पन्न झाल्याच्या घटनेला परवा, मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. चीनमधील वुहान शहरात बाधित आढळलेली हुबेई प्रांतातील ती ५५ वर्षांची व्यक्ती ‘पेशंट झिरो’ असल्याचा दावा काहींना मान्य नाही हे खरे. पण, गेले वर्षभर पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येकाने भीतीच्या छायेखाली एकेक दिवस वर्षासारखा कंठला असल्याने नोव्हेंबर की डिसेंबर महत्त्वाचे नाहीच. देश-प्रदेश, जात-धर्म, भाषा-संस्कृती असा कशाकशाचा भेदाभेद न मानणाऱ्या विषाणूच्या संक्रमणाने बेफिकीर होऊन हवेत उडणाऱ्या माणसांना एका झटक्यात जमिनीवर आणले.

व्यक्ती ते समष्टी असा जगण्याचा सगळा पट बदलून टाकला. दैनंदिनी, खाणेपिणे, आहार-विहार, सवयी, उपजीविका, इतकेच कशाला मानवी नातेसंबंध, कुटुंब, समाज वगैरेचा फेरविचार करायला लावला, हे अधिक महत्त्वाचे. चीनमधून निघालेला हा विषाणू साधारणपणे मार्चपर्यंत हळूहळू जगाच्या कानाकोपऱ्यात गेला. युरोप, अमेरिकेच्यासारख्या महासत्तांना त्याने झुकायला लावले. भारतासारख्या खंडप्राय, प्रचंड लोकसंख्येच्या देशाला त्याने धडा शिकवला. असह्य वेदना दिल्या. आजही त्यातून अनेकजण सावरलेले नाहीत. कोट्यवधी स्थलांतरित मजूर, बायाबापड्या व चिमुकल्यांची जीवघेणी पायपीट देशाने अनुभवली. कोट्यवधींच्या पोटापाण्याची साधने संकटात आली. उद्योग, व्यवसायाची घडी विस्कटली. अर्थव्यवस्थेला प्रचंड धक्का बसला. ती रुळावर आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केल्यानंतर दसरा-दिवाळीच्या काळात काही चांगल्या गोष्टी घडताना दिसल्या तरी अजून खूप अंतर कापायचे आहे.

या वर्षभरात कोरोना विषाणू दंतकथा बनला. लॉकडाऊन, कन्टेन्मेंट, आयसोलेशन वगैरे शब्द परवलीचे बनले. आधी सांगितले गेले, चीनमधल्या वेट मार्केटमधून खरेदी केलेल्या वटवाघुळ किंवा अन्य कोणत्या तरी वन्यप्राण्यापासून हा विषाणू माणसाच्या शरीरात पोहोचला. नंतर त्यात जगाचे राजकारण आले. चीननेच हा विषाणू प्रयोगशाळेत मुद्दामच तयार केल्याचा आरोप झाला. आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनविरुद्ध खटला चालविण्याची भाषा वापरली गेली. अंतिमत: काही सिद्ध झालेले नाही. कदाचित देशोदेशींच्या सत्ताधाऱ्यांनी महामारीचा फैलाव रोखण्यातील अपयश लपविण्यासाठी ते केले असावे. अर्थात, राजकारणीच नव्हे तर रक्ताच्या नात्यातल्यांसह नानाविध स्वभावाचे लोक कसे वागले याचे चांगले-वाईट अनेक अनुभव प्रत्येकाच्याच गाठीशी असल्याने, ‘हे कोविड, तुझे रंग हजार’ म्हणायची वेळ आली.  

ही विषाणूविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. त्यावर विजय मिळविण्याचा ध्यास मानवी समुदायाने घेतला आहेच. इस्रायली लेखक युवाल नोआ हरारी यांनी त्यांच्या होमो डिअस पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, भूक, युद्ध व रोगराई या तीन शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचा मोठा वारसा मानवजातीला आहे आणि त्याचा मार्ग विज्ञानावरील विश्वासातूनच जातो. कोणी कितीही भाकडकथा सांगितल्या तरी महामारीवर मात करण्याचा मार्ग विज्ञानच असल्याचे प्रत्येकाला मनोमन कळून चुकले आहे. थोडक्यात यानिमित्ताने विज्ञानाची महती मानवी मनांवर ठसवली गेली. तरीही धोका कायम आहे. किंबहुना तो अधिक वाढला आहे. युरोपमध्ये दुसरी लाट भयावह स्थितीत पोहोचली आहे. अमेरिकेतही स्थिती गंभीर आहे. इकडे दिल्लीत तिसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. विषाणूची भीती पाठीवर टाकून हातावर पोट असणारे लोक पुन्हा कामावर परतले आहेत. अनलॉक किंवा ‘मिशन बिगिन अगेन’ नावाने एकेक सार्वजनिक व्यवस्था खुली केली जात आहे. देवालये उघडली आहेत व ज्ञानालये उघडण्याची तयारी सुरू आहे. पण, हे करताना कमालीची दक्षता बाळगण्याची गरज आहे. एकमेकांपासून पुरेसे अंतर, मास्क व सॅनिटायझर हेच सध्या तरी या सावधगिरीचे उपाय आहेत.  कारण, संक्रमणाची ही आवर्तने सुरूच राहतील. डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसारख्या विषाणूंप्रमाणे कोरोनासोबतही जगण्याची मानसिक तयारी सगळ्यांनी केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. महिनाभरात ती आली तरी सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी बरेच महिने लागतील. सध्या संसर्गाने अंधारलेल्या क्षितिजावर सूर्योदयापूर्वीचे झुंजुमुंजु झाले, इतकेच म्हणता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या