शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

Budget 2020 : शेतकऱ्यांची यंदाही पुन्हा घोर उपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 12:04 PM

नाशवंत शेती उत्पादनांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या आहेत.

- सुनील तटकरे

(राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील उपगटनेते)

नाशवंत शेती उत्पादनांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणा निश्चितपणे आश्वासक आहेत; परंतु या योजनेची अंमलबजावणी कशी होणार? याबद्दल कोणताही खुलासा या अर्थसंकल्पात नाही. गेल्या सहा वर्षांपासून मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करीत आहे; परंतु प्रत्यक्षात शेतकरी विरोधी धोरणे राबवीत आहे. मोदी सरकारचे हेच धोरण या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानेही शेतकऱ्यांची प्रामुख्याने घोर उपेक्षाच केली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात येईल, असे आश्वासन देऊन मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या आशेने मोदी सरकारला मते दिली होती; परंतु २०१४-१९ या काळात केंद्र सरकारने फारसे काहीही झालेले नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली. एकट्या महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा ७ हजारांवर पोहोचला आहे. हीच स्थिती इतर राज्यांमधीलसुद्धा आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक बदल होतील, अशी आशा होती; परंतु या आशेवर या अर्थसंकल्पाने पाणी फेरले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी काही योजना निश्चितपणे जाहीर केल्या आहेत. ग्रामीण भागासाठी फलोत्पादनाला चालना देण्यासाठी योजनेची घोषणा झाली आहे, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १६ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. यात शेतकऱ्यांसाठी काही योजनांचा समावेश केला आहे. शेतकऱ्यांचा त्वरित नाश पावणाऱ्या उत्पादनांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजनांची घोषणा केल्या आहेत. या घोषणा निश्चितपणे आश्वासक आहेत; परंतु या योजनेची अंमलबजावणी कशी होणार? याबद्दल कोणताही खुलासा या अर्थसंकल्पात नाही.

सागरमाळा योजनेचे काय?

महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. काही वर्षांपूर्वी या सरकारने सागरमाळा योजना जाहीर करून समुद्रकिनारपट्टीला लागून असलेल्या भागाचा विकास करण्याचे सूतोवाच केले होते; परंतु दुर्दैवाने या अर्थसंकल्पात सागरमाळा या महत्त्वाकांक्षी योजनेचा उल्लेख झालेला नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळ बोलत होत्या; परंतु या भाषणातून शेतकऱ्यांची घोर उपेक्षा झाली आहे. या घोर उपेक्षेमुळे रोजगार तर निर्माण होणार नाही; परंतु भविष्यात बेरोजगारी मात्र वाढण्याचा धोका आहे.

 

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाFarmerशेतकरीagricultureशेतीsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस