शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
3
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
4
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
5
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
6
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
7
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
8
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
9
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
10
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
11
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
12
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
13
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
14
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
15
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
16
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
17
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
18
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
19
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

पुतण्याचा धावा... काका मला वाचवा!; काय आहे भाजपा अन् अजितदादांची अडचण?

By यदू जोशी | Published: August 18, 2023 8:44 AM

अजित पवार गटाने 'साहेबां'ची साथ सोडली तरी त्यांना साहेबांचा केवळ फोटोच नव्हे, तर प्रत्यक्ष साहेबच सोबत हवे आहेत. ही अपरिहार्यता का?

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

'शरद पवार यांना भाजपसोबत आणत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री करू,' अशी अट भाजपने घातली असल्यामुळे अजित पवार सातत्याने शरद पवार यांची मनधरणी करीत असल्याचा तर्क विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी हा तर्क सर्वप्रथम मांडला होता आणि पुतण्याच्या हट्टाला दाद न देणाऱ्या काकांनी पुन्हा एकदा पुतण्याची मुख्यमंत्रिपदाची वाट अडविली असल्याचेही नमूद केले होते. या मनधरणीमागे फक्त हेच कारण आहे, असे मात्र नाही.

अजित पवार आणि भाजपची अडचण वेगळीच आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. ते बाळासाहेबांसारखे बोलणारे, परिणामांची चिंता न करता सडकून टीका करणारे. एकंदरीत प्रति बाळासाहेबच! तरीही शिवसेनेचा, बाळासाहेबांचा राजकीय वारसा कोणासोबत गेला? राज बाहेर पडले तेव्हा त्यांच्याभोवती मोठे वलय होते, ते शिवसेना हायजॅक करतील, असे वातावरण होते. राज फायरखंड नेते; उद्धव ठाकरे त्यांच्या मानाने मवाळ पण शेवटी काय झाले? वारसा उद्धव ठाकरेंसोबत गेला. पक्षसंघटना राज यांच्यासोबत फारशी गेली नाही.

अशी बरीच उदाहरणे आहेत. याचा अर्थ राजकीय वारसा हा अपत्याकडे जातो; पुतणे, भाचे यांच्याकडे नाही. अजितदादा आणि भाजपला हीच भीती सतावत असणार. अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यात नेतृत्व गुणांबाबत तुलना केली तर निश्चितपणे भावाचे पारडे बहिणीपेक्षा जड आहे; पण पवार कुटुंबाला मानणाऱ्या मतदारांनी उद्या मतांची ओवाळणी बहिणीला टाकली तर? भावासाठी हा चिंतेचा विषय असणार.

शरद पवार यांची मराठा समाजावर आजही पकड आहे. ते आपल्यासोबत राहिले नाहीत तर मराठा व्होट बँकेत विभागणी होईल आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या प्रभावपट्ट्यात अपेक्षित यश मिळू शकणार नाही ही भीतीही अजितदादांना सतावत असणार. म्हणून तर ३५ हून अधिक आमदार सोबत असलेले अजित पवार १७ आमदार सोबत असलेल्या काकांची विनवणी करत आहेत. शरद पवारांचा वारसा अजित पवारांकडे यावा आणि अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना सन्मानाने सोबत घ्यावे, अशी आपल्या परिवाराची पुढची वाटचाल अजित पवार यांना अपेक्षित असावी. तसे केल्याने त्यांचे स्वतःचे नेतृत्व भक्कम बनते. भाजपशी असलेल्या युतीमध्ये त्यांचे महत्त्वही वाढते. शिवाय शरद पवार यांच्यासोबत असलेल्या धर्मनिरपेक्ष मतदारांची साथ मिळण्याची शक्यता कायम राहते.

मात्र, शरद पवार यांना ते नको आहे. भाजपला असलेला विरोध कायम ठेवत सुप्रिया यांचे राजकीय भवितव्य निश्चित करण्याचा जोरकस प्रयत्न त्यांच्यातील पिता करत आहे. शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर 'मविआ' चे कंबरडे मोडते हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला चांगलेच ठाऊक आहे! त्यामुळे त्यांच्याकडूनही अजितदादांवर काकांना सोबत आणण्याचा दबाव दिसतो.

बंडाचा डाग पुसण्यासाठी....

शरद पवार सोबत आले तर बंडाचा डाग पुसता येईल, हाही एक तर्क आहेच! एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार आजही तो डाग पुसू शकलेले नाहीत. 'वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारा नेता' असे प्रतिमाभंजन करणारे बिरुद ८३ वर्षांच्या काकांचा आजही पिच्छा सोडत नाही. त्याची सल मनात असणारच. 'वयोवृद्ध काकांना धोका देणारा पुतण्या' असे बिरुद अजितदादांना आज आणि भविष्यातही अशीच सल देऊन जाईल. ती खंत नको म्हणूनही आर्जव सुरू आहे. विठ्ठल, आराध्य दैवत असा शरद पवार यांचा उल्लेख करत, त्यांचे फोटो मिरवत आजही अजित पवार गट 'आम्ही साहेबांचे आणि साहेब आमचेच' असे भासवण्याचा प्रयत्न का करत आहे? कारण सरळ आहे, साहेबांची साथ सोडली तरी त्यांची प्रतिमा हवी आहे आणि केवळ प्रतिमाच नाही तर प्रत्यक्ष साहेबच सोबत हवे आहेत.

बंडखोरीनंतरही शरद पवार हे अजित पवार यांची नितांत गरज होऊन बसले आहेत. उद्धव ठाकरेंसोबतचे सगळे पाश एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फटक्यात तोडून टाकले. परिणामांची चिंता केली नाही. अजित पवार यांचे मात्र तळ्यात मळ्यात सुरू आहे. शरद पवार नावाच्या वटवृक्षाची सावली त्यांना हवी आहे रक्ताचे नाते इतके पटकन तुटत नाही हेही कारण असावे कदाचित. दुसरीकडे शरद पवार हे अजित पवारांना भीक घालताना दिसत नाहीत. त्यांनी आणि सुप्रिया सुळे यांनी मोदी भाजपवरील सडकून टीका सुरूच ठेवली आहे. कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे ते ठणकावून सांगत आहेत.

तीन राज्यांमधील आगामी निवडणुकांत भाजपचा सपशेल पराभव होईल आणि देशातील वातावरण मोदींच्या अधिक विरोधात जाऊन 'इंडिया'ला मोठा फायदा होईल, असा शरद पवार यांचा होरा आहे. २०१९ मध्येही ते असेच म्हणत होते. यावेळी ते अधिक जोरकसपणे तो दावा पुन्हा करत आहेत. आपले फोटो वापरणाऱ्यांविरुद्ध कोटांत जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याचा अर्थ आता अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साहेब आणि साहेबांची प्रतिमा याशिवाय पुढची वाटचाल करावी लागणार! ती अधिक अवघड असेल.

आपापल्या भागात प्रचंड प्रभाव असलेले अजितदादांसोबतचे काही आमदार, मंत्री पुन्हा निवडून येतील कदाचित; पण राजकीय भवितव्यासाठी तेवढे पुरेसे नसेल. आमदारांचा आकडा किमान ५० च्या वर नेला तरच सर्वार्थाने नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करता येईल. या सगळ्या गोष्टींसाठी अजित पवारांना शरद पवार हवे आहेत, एवढेच!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण