शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक सप्ताहातही कोंडी मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, ...

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, फक्त कमलाबाई चौकात नवीन वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. मात्र, रस्ता सुरक्षा अभियानाच्या कालावधीत अद्यापही ते सुरू झालेले नाहीत.

शहरातील बारा पत्थर रोडवर सारखी वाहतुकीची वर्दळ असते. या ठिकाणी चाळीसगा, अमळनेरकडून येणाऱ्या बसगाड्या, तसेच मालेगावकडून येणारी वाहने, त्याचबरोबर दुचाकी वाहनांची सारखी वर्दळ असते. त्यातच याच ठिकाणी भंगार बाजार आहे. लोखंड घेऊन या बाजारात एखादे मोठे अवजड वाहन आले की वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या लांबलकच रांगा लागतात. त्यातच दुचाकीस्वार मध्येच वाहने टाकत असल्याने, वाहतुकीच्या कोंडीत अधिक भर पडत असते. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असल्याने, अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. अशा रस्त्यावरून वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढी कठीण परिस्थिती असताना या ठिकाणी ना वाहतूक सिग्नलची व्यवस्था आहे, ना वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आलेली आहे. वाहनधारकच कसे तरी वाहन काढून कोंडीतून मार्ग काढत असतात.

हीच परिस्थिती शहरातील इतर वर्दळीच्या चौकातही कायम आहे. शहरातील ठरावीक दोन-चार चौक सोडले तर कुठेही वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही की, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. वाहनधारकांना ‘राम भरोसे’वाहने चालवावे लागतात.

रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असताना किमान या अभियानाच्या कालावधीत शहरातील वर्दळीच्या चौकात सुरळीत व सुलभ वाहतूक होईल या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा शासकीय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन होत राहील; मात्र रस्त्यावरची कोंडी कायम राहील हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे मत वाहनधारक व्यक्त करीत आहेत.