शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

धुळे - विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयातील लहान मुलांची ...

धुळे - विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयातील लहान मुलांची गर्दी वाढली असून ओपीडीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. पण विषाणूजन्य आजार वाढले आहेत. सर्दी, खोकला, डोकेदुखी आदी लक्षणे लहान बालकांमध्ये दिसत आहेत. वातावरण बदलामुळे हा त्रास होत असून तीव्र लक्षणे असलेल्या बालकांचीच कोरोना चाचणी करीत असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. आतापर्यंतच्या सर्वच कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

१० टक्के मुलांची कोरोना चाचणी

- ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसत आहेत. तीव्र लक्षणे असलेल्या मुलांची कोरोना चाचणी केली जात आहे.

- सुमारे १० टक्के बालकांची आरटीपीसीआर ही कोरोना चाचणी केली जात आहे. पॉझिटिव्हिटी मात्र शून्य टक्के असल्याची माहिती मिळाली.

डेंग्यू - मलेरियाची चाचणी

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सध्या केवळ तीन कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आहे. डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली असून चाचण्याही वाढल्या आहेत.

ही घ्या काळजी -

१ बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तेलकट पदार्थ खाऊ नये.

२ आईस्क्रीम, कुल्फी व इतर थंड पदार्थ खाऊ नये.

३ गर्दीत जाणे टाळावे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

बालरोग तज्ज्ञ म्हणतात....

काही दिवसांपासून ओपीडीतील लहान मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरवर्षी जुलै महिन्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असते. यावर्षी मात्र आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. पण खूप कमी जणांना ॲडमिट करण्याची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये.

- डॉ. तुषार कानडे, बालरोग तज्ज्ञ

जुलै महिन्यापासून विषाणूजन्य आजार वाढले आहेत. घरात आजारी व्यक्ती असेल तर लहान मुलांपासून वेगळे रहा. त्यांना स्पर्श करणे टाळा. आहारामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे डाळी, उसळ हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ असा सकस आहार घ्यावा.

- डॉ.नीता हाटकर, बालरोग तज्ज्ञ हिरे महाविद्यालय