शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बाल कल्याण समिती झाली ११५ अनाथांची नाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना तत्काळ मदत करणे व अशा अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहणे हे समाजातील सर्व घटकांचे आद्यकर्तव्य ...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना तत्काळ मदत करणे व अशा अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहणे हे समाजातील सर्व घटकांचे आद्यकर्तव्य आहे. प्रशासनाच्या मदतीने व दानशूर व्यक्तींच्या मदतीने अशा बालकांना सांभाळणाऱ्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे समितीतर्फे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विनंती केली की, किमान तालुक्यातील अशा संकटकाळात सापडलेल्या कुटुंबीयांचे विविध प्रकारचे टॅक्स माफ केले जावे व बालकल्याण समिती अशा कुटुंबीयांच्या पाठीमागे सदैव राहील, असे आश्वासित केले.

गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांनी अशा गावातील कुटुंबीयांच्या बाबतीमध्ये संबंधित ग्रामसेवकाकडून ठराव मागवण्यात येईल व टॅक्स माफीची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही आश्वासित केले. याप्रसंगी आमदार गावित यांच्यासह नायब तहसीलदार गोपाळ पाटील, बाल संरक्षण अधिकारी योगेश धनगर, संदीप मोरे, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे ,साक्री शहराचे पीआय आहेर, तालुक्यातील सर्व सीडीपीओ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तडवी, डॉ. गोविल व पीडित बालकांचे सांभाळ करणारे कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.