शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव येथे माथेफिरूने कापसाची झाडे उपटलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST

बोरगाव येथील शेतकरी अर्जुन चिंधा पाटील यांची बोरगाव शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीचे कामकाज चंदू हिरालाल पाटील हे सांभाळत ...

बोरगाव येथील शेतकरी अर्जुन चिंधा पाटील यांची बोरगाव शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीचे कामकाज चंदू हिरालाल पाटील हे सांभाळत असतात. मे महिन्याच्या अखेरीस चंदू पाटील यांनी या शेतात कापूस पिकाची लागवड केली होती. या परिसरातील हे सगळ्यात चांगले कापसाचे पीक उभे राहिले होते़ एकाच झाडाला ४० ते ५० कापसाची बोंडे आली आहेत. येत्या १२ ते १५ दिवसात या कापूस झाडांवरील बोंडे फुटून त्यातून कापूस पिकाचे उत्पन्न येणार होते.

मात्र अज्ञात माथेफिरूने २४ रोजीच्या मध्यरात्री चक्क या शेतातील १०० ते १२५ झाडे उपटून फेकत मोठे नुकसान केले आहे. संबंधित शेतकरी सकाळी शेतावर गेले असतांना त्यांना कापसाचे झाडे उपटलेली दिसून आले. त्यांनी तातडीने गावातील ग्रामस्थांना कळविले़ नागरिकांनी शेतात येवून पाहणी करून आश्चर्य व्यक्त केले़ अज्ञात माथेफिरूचा शोध घेणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी अनेकांनी बोलून दाखविले़ अन्यथा काही दिवसानंतर पुन्हा अशाप्रकारची घटना घडू शकते असेही चर्चिले गेले़

यापूर्वीदेखील चंदू पाटील यांच्या शेतातील कापूस पिकाची झाडे उपटून फेकत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे़ गेल्या १० दिवसांपूर्वी देखील त्यांच्या शेतातील बोअरअवेलच्या पाईप फोडून नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले़

फोटो- मेलवर/फाईल पहाणे