शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा, पथदिव्यांची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

समुद्रवाणी : ग्रामपंचायतीच्या १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथदिवे व पाणीपुरवठ्यांची वीजबिले अदा करण्याबाबत २३ जून रोजी ...

समुद्रवाणी : ग्रामपंचायतीच्या १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथदिवे व पाणीपुरवठ्यांची वीजबिले अदा करण्याबाबत २३ जून रोजी राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील लासोना ग्रामपंचायतीच्या पथदिवे व पाणीपुरवठ्याची वीजजोडणी तोडली आहे. यामुळे ग्रामस्थांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वास्तविक ग्रामपंचायतीला मिळणारा १५ वा केंद्रीय वित्त आयोगाचा निधी हा प्रत्यक्षात वादळ, पाण्याचा निचरा, साठा व्यवस्थापन, मुलांचे लसीकरण, कुपोषण, जोड रस्ते, गावांतर्गत रस्ते बांधकाम, स्मशानभूमीचे बांधकाम, स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण, दफनभूमी देखभाल, एलईडी पथदिवे, सार्वजनिक वाचनालय, उद्यान, साथीच्या प्रादुर्भावावेळी त्वरित मदत उपलब्ध करणे आदी बाबींवर खर्च करावा, असे ग्रामपंचायतींना निर्देश आहेत. शिवाय, ही रक्कम फक्त ऑनलाइन व वार्षिक आर्थिक आराखडा तयार करताना गतवर्षीच्या आराखड्यात घेतलेल्या कामावरच खर्च करता येते. असे असताना आता ही रक्कम वीज वितरण कंपनीकडे कशी वळवायची, असा प्रश्न गावकारभाऱ्यांच्या व ग्रामसेवकांच्या समोर आहे. एकीकडे केंद्रीय निधी व त्याचे निकष तर दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक अशा दुहेरी कात्रीत व वितरण कंपनीच्या आडमुठी धोरणात ग्रामपंचायती अडकल्या असून, यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा अनेक ग्रामपंचायतींना या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोट......

२३ जून २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची थकीत वीजबिले भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, पंधराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करण्यासाठी सदर बाब वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट असणे गरजेचे आहे. यामुळे ग्रामपंचायतीस विद्युत देयकाची अदाई करण्यास अडचण येत आहे.

- ज्ञानेश्वर सोकंडे,

ग्रामसेवक, कामेगाव-लासोना