शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:45 IST

भूममधील शेतकऱ्यांवर मोठे संकट; नदी काठच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त 

- संतोष वीरभूम (धाराशिव) : तालुक्यात २१ सप्टेंबर रोजी  झालेल्या पाचही मंडळांतील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. नदीकाठची हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त झाली. ७०२ हेक्टर शेती तर खरडून वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांना जीव वाचवण्यात यश आले तरी “आता पुढे जगायचे कसे?” हा प्रश्न त्यांच्या डोळ्यांत अश्रू घेऊन सतत चिंतेच्या विचाराने उभा राहत आहे.

दिनाक २२ रोजी रामगंगा व बाणगंगा नद्यांनी रात्रभर धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंचपूरजवळील तब्बल ५०० मीटर रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याच परिसरात शेतात राहत असलेले भारत रामभाऊ मोरे यांच्या घरातही पुराचे पाणी घुसले. यामुळे रात्रीच्या अंधारात कुटुंबातील सात सदस्य थरथरत होते. जीव वाचवण्यासाठी मोरे यांचा मुलगा गणेश यांनी पोटच्या दोन लहान मुलांना तासभर खांद्यावर घेऊन उभे राहिले. घरात पाणी प्रवाहाने शिरू नये म्हणून गणेश मोरे यांनी दरवाजा लावला होता. यामुळे दरवाज्याला पाणी थापून घरात काही प्रमाणात पाणी कमी येत होते. परंतु गावकऱ्यांनी मोरे यांना पाण्याचा प्रवाह वाढत आल्याने बाहेर निघा असे सांगितल्याने. मोरे यांनी घरा समोर वाहत आलेल्या लिंबाच्या झाडांचा आधार घेत वाट काढली. धाडसाने त्यांनी घरातील ७ सदस्यांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. यामुळे थोडक्यात दुर्घटना टळली. मात्र, मोरे परिवार हे शेतीवर आधारित असल्याने त्यांचे पुढचे आयुष्य पूर्णतः थांबले आहे.  मोरे यांची ३ एकर २० गुंटे शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली. यामध्ये तब्बल २ एकर द्राक्षबाग पूर्णपणे वाहून गेली, तर उर्वरित जमिनीवरील खरीप पिकेही पूर्णतः नष्ट झाली. आयुष्यभराचा घाम आणि परिश्रम क्षणात वाहून गेल्याने मोरे हतबल झाले आहेत.

“जीव वाचला खरी, पण आता शेती नाही, बाग नाही, कमाई नाही. बँकेचे कर्ज कसे फेडायचे? कुटुंब कसे चालवायचे?” अशा प्रश्नांनी मोरे यांचे मनोबल खचले असून त्यांनी डोक्याला हात लावून वाहून गेलेल्या शेती कडे पाहत टाहो फोडला आहे. या आपत्तीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यावर काळे ढग दाटून आले आहेत. शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत केली नाही तर भूम तालुक्यातील शेतकरी पुनर्वसनाऐवजी उद्ध्वस्तच होतील, अशी भीती शेतकरी वर्गातून  व्यक्त केली जात  आहे.

१४५ जनावरे दगावली, हजारो हेक्टर शेतीचे नुकसानतालुक्यात झालेली अतिवृष्टीने नदीकाठी राहत असलेल्या नागरी वस्ती व जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने २ दिवसात १४५ जनावरे दगावली आहेत. यामध्ये काही वाहून गेली तर काही जाग्यावरच दगावली आहेत. ३०७ घरांची परझड झाली आहे. तर तब्बल ७०२ हेक्टर शेती खरडून वाहून गेली असून हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. अशी माहिती तहसील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले आहे. ज्या शेतीवर पूर्ण परिवार अवलंबून आहे. ती शेतीच खरडून वाहून गेल्याने ती पुन्हा कशी तयार करायची व कसायची या चिंतेने मी हातबल झालो आहे भारत मोरे चिंचपूर येथील शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊसfloodपूर