शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

परंड्यात वाढले कांद्याचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

परंडा : तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी कांदा पिकाला नगदी पीक म्हणून प्राधान्य देत आहेत. आजमितीला तालुक्यात ...

परंडा : तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी कांदा पिकाला नगदी पीक म्हणून प्राधान्य देत आहेत. आजमितीला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाची लागवड होत असून, भविष्यातील कांद्याचे विक्रमी उत्पादन पाहिल्यास कांद्याला चांगला भाव मिळावा, या दृष्टिकोनातून तालुक्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सीना-भीमा जोड कालवा, सीना-कोळेगाव धरणासह, अनेक मध्यम प्रकल्प सिंचनाचे स्रोत बनू पाहत आहेत. यासोबतच प्रा.तानाजीराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले नदी, नाले खोलीकरण व रुंदीकरण व गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये सर्व शासकीय यंत्रणाकडून मृद व जलसंधारणाच्या झालेल्या कामामुळे भूगर्भातील जलस्तर वाढला आहे. त्यामुळे उसाच्या क्षेत्रासह शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडेही कल वाढला आहे. त्यातच कांदा पिकाला शेतकरी नगदी पीक म्हणून महत्त्व देत आहेत. फक्त पोळ कांद्याचे उत्पादन न होता, लेट खरीप, रब्बी व काही प्रमाणात उन्हाळी हंगामामध्येही कांदा पिकाचे उत्पन्न घेतले जात आहे. कांदा पिकाला हमीभाव नसल्याने बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना तोट्याची शेती करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी कांदा पिकाला साधारणपणे १८ हजारांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर मात्र, कांद्याचे दर कोसळतच आहेत. अशा काळात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत व स्वखर्चाने कांदा चाळीही उभारल्या आहेत. कांदा पिकाचे दर कोसळल्यास उन्हाळी हंगामातील कांदा पीक चाळीमध्ये साठविला जातो. मात्र, या सुविधा सगळ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाहीत. अशा वेळी त्यांना उतरत्या दराचा सर्वाधिक फटका बसतो. मात्र, अशा काळात कांद्यावरील प्रक्रिया उद्योग केंद्र मदतीला धावून येऊ शकते. मात्र, तालुक्यात कांद्यावरील प्रक्रिया उद्योग केंद्र अस्तित्वात नाही. तालुक्यातील सिंचनाचे वाढते क्षेत्र पाहता, कृषी विभागाकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. परिणामी, भविष्यात कांदा पिकावरील प्रक्रिया उद्योग स्थापन होऊन, शेतकरी बांधवांना उत्पादित कांदा पिकाला हमीभाव मिळेल व आर्थिक जीवनमान उंचावेले, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

चौकट....

प्रक्रिया उद्योग केंद्र नाही.....

सध्या स्थिती मध्ये उन्हाळी कांदा पिकाला १,३०० ते १,४०० सरासरी भाव आहे, तसेच सोयाबीन, उडीद या पिकाचे हेक्टर क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. कृषी विभागामार्फत उडीद, कपाशी, कांदा व सोयाबीन या पिकाचे कीड-रोग व सल्ला प्रकल्पांतर्गत निरीक्षणे नोंदवून आर्थिक नुकसान पातळीबाबत सल्ला दिला जात आहे. तालुक्यात शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला असून, त्यात प्रामुख्याने उडीद, सोयाबीन कांदा पिकांचा शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. तालुक्यात कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन होऊनही कांद्यावरील प्रक्रिया उद्योग केंद्र अस्तित्वात नाही. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

170921\psx_20210917_143451.jpg

नगदी पीक म्हणून परंडा तालुक्यातील अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे लागवड करण्यात येत आहे.