शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:31 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तिथे हिंसाचाराचा घटना सातत्याने समोर येत आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तिथे हिंसाचाराचा घटना सातत्याने समोर येत आहे. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ४ मे पासून आतापर्यंत अनेक ठिकाणी निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीनंतर राज्य सरकारने १० सदस्यीय 'फॅक्ट फाइंडिंग कमिटी'ची घोषणा केली आहे.

आसनसोलमधील गोधुली भागात टीएमसीच्या एका कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, तर हावडा येथील दुमुरजाला येथील कार्यालयालाही टार्गेट करण्यात आलं. टॉलीगंज, कसबा, बारुईपूर, कमरहाटी, बारानगर, हावडा आणि बहरामपूर येथील टीएमसी कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची माहिती आहे. बीरभूममध्ये, न्यू टाउनमध्ये आणि इतर दोन ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी कोलकाता येथील न्यू टाउन परिसरात विजय मिरवणुकीदरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत भाजपा कार्यकर्ते मधु मंडल यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे बीरभूमच्या नानूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यकर्ता अबीर शेख यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.

Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला

Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. ९ मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजपाने प्रचंड बहुमत मिळवत २०७ जागांवर विजय नोंदवला आहे, तर टीएमसी केवळ ८० जागांवर आहे. ममता बॅनर्जी यांना स्वतःची जागाही वाचवता आली नाही. भवानीपूरमध्ये त्यांचा मोठा पराभव झाला असून सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचा १५,११४ मतांनी पराभव केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal Violence: TMC Offices Vandalized, Four Dead After Election

Web Summary : Post-election violence in West Bengal has resulted in four deaths and the vandalism of over 400 TMC offices. The state government has announced a fact-finding committee to investigate the widespread incidents, including attacks on party workers and offices in multiple districts. BJP claims victory amidst unrest.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा