शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:42 IST

शाळेतून परतणाऱ्या आठवीच्या दोन विद्यार्थिनींचा भरदिवसा विनयभंग करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी आणि भीतीदायक आहे. शाळेतून परतणाऱ्या आठवीच्या दोन विद्यार्थिनींचा भरदिवसा विनयभंग करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बाईकवरून आलेले चार गुंड विद्यार्थिनींचा पाठलाग करत होते. यावेळी घाबरलेल्या विद्यार्थिनींनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

विद्यार्थिनींनी अंगावर काटा आणणारा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला आहे. दोन्ही मुली शाळेत परीक्षा देऊन परतत असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. विद्यार्थिनींनी सांगितलं की, आम्ही परीक्षा देऊन येत होतो. त्याचवेळी रस्त्यावर गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला. चार गुंड आमच्या मागे लागले. आम्ही खूप आरडाओरडा केल्यावर ते पळून गेले. पप्पा आम्हाला वाचवा असं आम्ही ओरडत होतो. आम्ही त्या लोकांना ओळखत नाही.

शुक्रवारी ही घटना घडली. तरकुलवा भागातील नारायणपूर भागात बांधलेल्या शाळेत आठवीच्या वर्गातील दोन विद्यार्थिनी सायकलवरून शाळेत जातात. त्या दिवशी दोघींच्या परीक्षा होती. परीक्षा संपल्यानंतर दोन्ही मुली घरी परतण्यासाठी निघाल्या. या मुलींनी घरी जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर केला त्या मार्गावर शेती आहे. दोघीही शाळेतून निघाल्या तेव्हा जवळपास ६०० मीटर अंतरावर पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत भयंकर प्रकार घडला. 

बाईकवरून येणारे चार जण मुलींचा पाठलाग करत होते. चारही गुंड मुलींना घेरून त्यांचा विनयभंग करतात. त्यामुळे मुली सायकलवरून खाली पडतात. काही गुंड एका मुलीला शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. मुली ओरडू लागतात. यावेळी आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत येतात. लोकांना पाहताच गुंड बाईकवरून पळून जातात. 

काही अंतरावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेबाबत कॅबिनेट मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी सांगितलं की, आरोपी बाईकवर होते, त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्यास सांगितलं आहे. जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश