शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना कोरोनाच्या संसर्गाची धास्ती, ५० टक्के ड्युटी लावण्याचा आदेश कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 13:07 IST

महासंचालकांचे आदेश आयुक्त, अधीक्षकांकडून दुर्लक्षित

ठळक मुद्दे या विषाणूचा संसर्ग त्यांनाही जडण्याचा धोका असल्याने प्रत्येक पोलीस ठाणे व विविध शाखामध्ये कार्यरत असलेल्यापैकी ५० टक्के अधिकारी, अंमलदारांची ड्युटी लावण्याचे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सर्व घटकप्रमुखांना दिले आहेतदेशात कोरोनाची सर्वाधिक लागण असलेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असून ती दिवसेंदिवस वाढत राहिली आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. सहाय्यक आयुक्त व त्यावरील दर्जाचे अधिकारी घरी किंवा कार्यालयात बसून कनिष्ठ अधिकाऱ्यांना फर्मान सोडत आहेत.

जमीर काझीमुंबई : प्रत्येक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले राज्य पोलीस दलातील सव्वा दोन लाखावर खाकी वर्दीवाले ‘कोरोना’च्या पादुर्भावाला लगाम घालण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. या विषाणूचा संसर्ग त्यांनाही जडण्याचा धोका असल्याने प्रत्येक पोलीस ठाणे व विविध शाखामध्ये कार्यरत असलेल्यापैकी ५० टक्के अधिकारी, अंमलदारांची ड्युटी लावण्याचे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत, मात्र त्यांच्या या आदेशाकडे पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी अद्यापही डोळेझाक केली आहे.

सर्वच पोलिसांना कामावर पाचारण करण्यात येत आहे.नेहमीप्रमाणे त्यांना ड्युटी लावण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांमध्ये संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आयुक्तालयासह जिल्ह्याच्या ठिकाणी काहीचा अपवाद वगळता बहुतेक वरिष्ठ अधिकारी घरी बसून किंवा कार्यालयातून सूचना देत आहेत. मात्र निरीक्षक व त्याखालचे अधिकारी आणि अंमलदारांना रोज पोलीस ठाणे व रस्त्यावर बंदोबस्ताची ड्युटीला सामोरे जावे लागत आहे. खात्यातील शिस्तीच्या बडग्यामुळे त्यांना वरिष्ठांच्या मनमानीबद्दल उघडपणे बोलता येत नसल्याने तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.राज्यासह पुर्ण जगाला कोरोनाच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागत आहे. देशात कोरोनाची सर्वाधिक लागण असलेल्या रुग्णांची संख्यामहाराष्ट्रात असून ती दिवसेंदिवस वाढत राहिली आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. कोरोनाग्रस्ताच्या सानिध्यात असलेल्यांनाही त्याची लागण होत असल्याने ही संख्या झपाट्याने वाढत राहिली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सर्व सरकारी, खासगी अस्थापनाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ५० टक्के हजेरी ठेवून उर्वरिताना सुट्टी देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कालावधीत सर्व पोलीसही नागरिकांच्या मदतीला जुंपले असून सार्वजनिक वाहतुक कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांना या विषाणूचा पादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने सर्व घटक प्रमुखांनी आपापल्या शाखा, ठाण्यातील पोलिसांची हजेरी ५० टक्के लावावी, एकदिवसाआड त्यांना आलटून पालटून ड्युट्या देण्यात याव्यात, पोलिसांना या आजाराची लागण होवू नये, यासाठी विशेष खबरदारी बाळगण्याचे आदेश १९ मार्चला पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्याकडून बजाविण्यात आले आहेत. त्यांची अंमलबजावणी तातडीने करावयाची असताना बहुतेक घटकप्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सहाय्यक आयुक्त व त्यावरील दर्जाचे अधिकारी घरी किंवा कार्यालयात बसून कनिष्ठ अधिकाऱ्यांना फर्मान सोडत आहेत.

Corona virus : खाकी वर्दीतली 'माणूसकी'... बंद काळात निराधार भिकाऱ्यांना पोलिसांचाच आधार

काय आहेत महासंचालकांचे आदेश ?पोलीस महासंचालकांनी गुरूवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व विभाग, शाखा व पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांची हजेरी ५० टक्केवर आणावी, अतिमहत्वाचे व तातडीचे कामासाठी तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवरील गर्दी कमी करण्याचे काम त्यांना देण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांना रोज कार्यालयात न बोलाविता आळीपाळीने ड्युटी लावाव्यात, प्रत्येक शाखेत दोन टीम तयार ठेवून त्यापद्धतीने आखणी करण्यात यावी,

अधिकारी, अंमलदारांना कोरोनाचा संसर्ग होवू नये,यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेवून ड्युटीचे नियोजन करावे, पोलिसांना रोज सलगपणे ड्युटी देवू नये, त्यांच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात यावी - सुबोध जायसवाल ( पोलीस महासंचालक)

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र