शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

Arnab Goswami: अर्णब गोस्वामींवर हक्कभंग कारवाई? प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावावर चर्चा

By हेमंत बावकर | Published: November 05, 2020 7:45 PM

Arnab Goswami Arrest : अर्णब यांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.

अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी तुरुंगात आहेत. उच्च न्यायालयानेही जामीन न दिल्याने आज दुसऱ्य़ा दिवशीही गोस्वामी यांना अलिबागच्या मराठी शाळेत रहावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनीही महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविलेला असताना आता आणखी अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समितीची गुरुवारी बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये अर्णब गोस्वामींच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. यासाठी 16 सप्टेंबरला महाराष्ट्र विधानसभेत अर्णब गोस्वामीविरोधात हक्कभंग प्रस्ताव देण्यात आला होता. अशाच प्रकराचा आणखी प्रस्ताव आमदार मनिषा कायंडे यांनी विधान परिषदेतही दिला होता. 

या प्रस्तावांवर आज चर्चा करण्यात आली. हक्कभंग प्रस्तावावर समितीने गोस्वामी यांना चारवेळा हजर राहण्याची नोटीस पाठविल्या आहेत. मात्र, ते समितीसमोर हजर झाले नाहीत. शेवटची नोटीस 16 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी अर्णबला देण्यात आली होती. त्यांना दुपारी ३ वाजता केवळ 10 मिनिटे विधानसभेत हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी महाराष्ट्र सचिवालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये अर्णबला 16 सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. 

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर 'आणीबाणी 2.0' असा उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. आणीबाणी 2.0 मध्ये तुमचं स्वागत आहे, असा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.

अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबईउच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. फिर्यादी आज्ञा नाईक, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना न्यायालयाने बजावली नोटीस. उद्या दुपारी ३ वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी अर्णव गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच असं म्हणावं लागेल. 

अर्णब यांना अंतरिम दिलासा नाही

अर्णब यांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी म्हणून सेशन कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे अखेर अर्णब यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे उद्या दुपारी अर्णब यांच्या जामिनावर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडे सर्वाचं लक्ष आहे. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसpratap sarnaikप्रताप सरनाईक