शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये धो-धो पाऊस; रस्त्यावर पाणीच पाणी

By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST

बीड: तब्बल महिना उलटल्यानंतर वरुणराजाने रविवार व सोमवारी आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.

बीड: तब्बल महिना उलटल्यानंतर वरुणराजाने रविवार व सोमवारी आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. बीड शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. पाण्यातून रस्ता करताना वाहनधारकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.बीड जिल्ह्यासह मराठवाड्याला पावसाचे वेध लागले होते. अखेर सोमवारी पहाटे वरुणराजाने आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. सोमवारी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. धो-धो पाऊस पडल्याने अनेकजण पावसाचा आनंद घेताना दिसून येत होते. काही ठिकाणी नाल्या तुंबलेल्या असल्याने रस्त्यावर पाणी आले. रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे या पाण्यातून रस्ता शोधताना वाहनधारकांची तारांबळ उडत होती. त्यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात बंद पडत होत्या. बंद पडलेल्या गाड्या ढकलताना वाहनधारकांची दमछाक होताना दिसून आले.शहरातील नगरनाका, शिवाजी चौक, शिवाजीनगर पोलीस ठाणे, सुभाष रोड, स्टेडीयम कॉम्प्लेक्स, सहयोनगर, गजानन मंदिर परिसर, माळीवेस, पेठ बीड, आंबेडकर चौक, पंचशील नगर, मित्रनगर आदी भागात रस्त्यावर पाणी आल्याचे दिसून आले. नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली मान्सून पूर्व कामे व्यवस्थित न झाल्याने पाणी रस्त्यावर आले. नाल्यांमधील कचऱ्याला पाणी आडून रस्त्यावर आले होते.पथदिवे बंद असल्याने रस्ता शोधणे झाले अवघडसुभाष रोडवरील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत असताना नागरिकांचे व वाहनधारकांचे हाल होताना दिसून आले. पावसाने आगमन करताच या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे या भागात सर्वत्र अंधार पसरला होता. सुभाष रोडवरील साठे चौकाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. जास्त पाणी असल्याने दुचाकी, चार चाकी वाहने बंद पडली होती. तसेच या रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार दिसून आला. हे पथदिवे सुरू करावेत व सुभाष रोड भागातील नाल्या सफाई करण्यात यावी, अशी मागणी सुभाष रोड व्यापारी संघटनेच्या वतीने मंगेश लोळगे यांच्यासह इतर व्यापाऱ्यांनी केली आहे.अनेकांच्या घरात शिरले पाणीरविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. घरातील पाणी बाहेर काढताना नागरिकांचे हाल होताना दिसून आले. अनेकांनी रात्र जागून काढली. शहरातील नाल्या सफाईची मागणी जोर धरू लागली आहे.