शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीची जमीन आणि नदीपात्र भूमाफियांनी हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST

औरंगाबाद : जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) ताब्यातील जमीन आणि संस्थेलगत असलेली धारीम नदीचे पात्र भूमाफियांनी हडपल्याची तक्रार ...

औरंगाबाद : जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) ताब्यातील जमीन आणि संस्थेलगत असलेली धारीम नदीचे पात्र भूमाफियांनी हडपल्याची तक्रार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीवरून उपायुक्त पराग सोमण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वाल्मीला देण्यात आलेल्या एकूण जमिनीचे मोजमाप करण्याचे आदेश दिले आहेत. जमिनीचे मोजमाप करून त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे.

कांचनवाडी परिसरातील वाल्मीला दिलेल्या एकूण जागेपैकी फक्त १० टक्के जागेचा वापर झाला आहे. निवासी संकुल, संशोधन संस्था, परीक्षण केंद्र, रोपवाटीका, तलाव आदी उपक्रमांसाठी तेथे जमीन देण्यात आली होती. वरील उपक्रमांसाठी जमीन वापर केल्यानंतर उरलेली जमीन भूमाफियांनी अतिक्रमित करून बनावट दस्तावेजा आधारे विक्री करण्यात आल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत वाल्मीला दिलेल्या जमिनीची मोजणी करण्याची मागणी तक्रारकर्त्या संघटनेने केली आहे. एकूण १४ गटांतील जमीन वाल्मीसाठी देण्यात आली होती. यातील किती जमीन अतिक्रमित झाली, किती जमीन बेकायदेशीररीत्या विक्री झाली. याची माहिती एकूण मोजमाप झाल्यानंतर समोर येणे शक्य आहे. विभागीय आयुक्तांनी सदरील प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना जमीन मोजणी करण्यासाठी पत्र दिले आहे.

धारीम नदीचे पात्रही केले सपाट

वाल्मीतून वाहणाऱ्या धारीम नदीचे पात्रदेखील भूमाफियांनी सपाट केले. त्यामुळे नदीचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सदरील नदीचे पात्र अतिक्रमित झाल्यामुळे पर्यावरणाच्या इको सिस्टिमला धक्का बसला आहे. सदरील ठिकाणी नदीचे पात्र अतिक्रमित झाले आहे काय, याचीदेखील मोजणी आयुक्तालयाच्या आदेशाने करण्यात येणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वाल्मी जमीन अतिक्रमणप्रकरणी माझ्याकडे तक्रार आली, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मोजणी करण्यासाठी पत्र दिले आहे.