शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘त्या’ दरोडेखोरांनी औरंगाबादेत घातला होता धुमाकूळ !

By admin | Published: July 31, 2014 12:14 AM

बीड : दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा मंगळवारी दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या दुचाकीचोरांनी औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता, अशी माहिती तपासात पुढे आली.

बीड : दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा मंगळवारी दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या दुचाकीचोरांनी औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता, अशी माहिती तपासात पुढे आली. नारायण उर्फ प्रमोद काकासाहेब पठाडे (रा. साष्टपिंपळगाव ता. अंबड जि. जालना) दादासाहेब रमेश शिंदे (रा. भोजगाव ता. गेवराई) यांचा आरोपींत समावेश आहे. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार किंमतीच्या ११ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केल्यावर अनेक बाबींचा उलगडा झाला. फायनान्सच्या नावाखाली विक्रीचोरुन आणलेल्या दुचाकींची नारायण पठाडे व दादासाहेब शिंदे हे दोघे फायनान्सच्या नावाखाली विक्री करत होते. नव्या कोऱ्या दुचाकी स्वस्तात देऊन त्यांनी धंदाच मांडला होता. स्वस्तातील दुचाकीला भुलून लोकही त्यांच्याक डून दुचाकी खरेदी करायचे.पाळत ठेवून चोऱ्याया चोरांनी औरंगाबाद जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पैठण, बिडकीन, ढोरकीन, कुकाना या भागातून ते दुचाकी पळवून गेवराईत विक्री करत होते. पैठण येथे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी आलेले लोक नदीत गेल्यावर ते दुचाकी पळवत, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. (प्रतिनिधी)ओळखीतून जवळीकआरोपी दादासाहेब शिंदे याची सासरवाडी साष्टपिंपळगाव (ता. अंबड जि. जालना) ही आहे.शिंदे यांच्या सासऱ्यांच्या घराला चिकटूनच नारायण पठाडे याचे घर आहे. त्या दोघांत ओळख झाली.त्यानंतर ते एकत्र आले अन् त्यांनी दुचाकी चोरण्यास सुरुवात केली, अशी माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख भारत राऊतयांनी दिली.