शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सय्यदपूरच्या सरपंचांचे अपील फेटाळले : अपात्र ठरविणाऱ्या आदेशाला दिले होते आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST

हरीश ग्यानोबा चिंतलवाड यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्धचे अपील विभागीय आयुक्तांनी फेटाळले आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम केला. वेळेत जात ...

हरीश ग्यानोबा चिंतलवाड यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्धचे अपील विभागीय आयुक्तांनी फेटाळले आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम केला.

वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चिंतलवाड यांना अपात्र ठरविले होते.

रेणापूर तालुक्यातील सय्यदपूर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच हरीश चिंतलवाड २०१७ साली आरक्षित प्रवर्गातून निवडून आले होते.

निवडीनंतर तीन वर्षे उलटले तरी त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. म्हणून दीपक नरसिंग सूर्यवंशी यांनी सरपंच चिंतलवाड यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांना अपात्र घोषित केले होते. त्याविरुद्ध त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.

औरंगाबाद येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अहवाल मागविणे आवश्यक होते. तसा अहवाल न मागवता, अपात्र ठरविणे अयोग्य आणि अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद सरपंचांच्या वतीने करण्यात आला, तर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार निर्णय दिलेला आहे. अर्जदार सरपंचांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र घोषित केल्याचे नमूद करीत विभागीय आयुक्तांनी सरपंचांचे अपील फेटाळले. मूळ तक्रारकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. ब्रह्मानंद धानुरे व अ‍ॅड. रामेश्वर चव्हाण यांनी काम पाहिले.