शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसातही पेरणीची सरासरी पार !

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात झालेला पाऊस व तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडत असलेला रिमझिम पाऊस यामुळे जिल्ह्यात आता खरीपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे.

दिनेश गुळवे , बीडगेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात झालेला पाऊस व तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडत असलेला रिमझिम पाऊस यामुळे जिल्ह्यात आता खरीपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे. धान्य तर पेरले आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी पाऊसाने हुलकावणी दिली आहे. अजुनही जिल्ह्यात केवळ ११० ते १३० मि.मी. पाऊस पडलेला आहे. पावसाची ही सरासरी अत्यंत अल्प आहे. असे असले तरी जो काही पाऊस झाला, त्यावरच शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ ठेवली आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचे ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात तब्बल ७ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत ६ लाख २१ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे तंत्र अधिकारी पी. बी. बनसावीडे यांनी सांगितले. पेरणीचा हा आकडा सरासरी पेक्षा अधिक असला तरी आवश्यक त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावषी २४ जुलैपर्यंत जवळपास एक लाख हेक्टरवर कापसाचे क्षेत्र कमी आहे. कापसासह सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचा पेराही यावर्षी पावसाअभावी कमालीचा घटला आहे. बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा घटल्याने धान्य उत्पादन तर घटणारच आहे, शिवाय जनावरांसाठी कडबाही उपलब्ध होणार नसल्याचे मत शेतकरी गंगाधर तळेकर यांनी व्यक्त केले. गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी या परिसरात पावच अगदीच अत्यल्प आहे. जिल्ह्याच्या सरासरीने जरी शंभरी ओलांडली असली तरी काही तालुक्याने अद्याप ५० मि.मी. ही पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे़पेरा आणखी वाढण्याची शक्यतापीक२०१४२०१३ कापूस३३८९००४१०४००ज्वारी१३१००१९७००बाजरी७४२००९२४००मका६७००१४३००तूर३१४००४०७००मूग७४००१३९००उडीद७५००१५१००सोयाबिन१३२९९९१३३४००भुईमूग१६८१४२००सूर्यफूल३२९८००तीळ१५३८२१००कारळ३४५९००भात३००७००जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आर. एस. भताने म्हणाले की, आतापर्यंत पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला, तरी येत्या काही दिवसांमध्ये खरिपाच्या पेरणीचे क्षेत्र आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्याने पेरा केलेला आहे, त्यांनी पीक विमाही भरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.१०० मि़मी़ पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करु नयेत, असे आवाहन भताने यांनी केले आहे़