शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

१० कोटींचा टंचाई आराखडा

By admin | Updated: July 4, 2014 00:14 IST

संजय तिपाले , बीड जून संपला, जुलै उजाडला; पण पाऊस काही बरसलाच नाही़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे़ या स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन वेगाने कामाला लागले

संजय तिपाले , बीडजून संपला, जुलै उजाडला; पण पाऊस काही बरसलाच नाही़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे़ या स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन वेगाने कामाला लागले असून तब्बल १० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़ जि़प़ कडून हा आराखडा गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला़ जिल्ह्यात महिनाभरात केवळ २८ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे़ पेरणीचे क्षेत्र २ टक्क्यांच्या पुढे सरकायला तयार नाही़ एकूण जलाशयातील पाणीसाठी अवघा ७ टक्के इतका आहे़ पाऊस नसल्याने टंचाई दिवसेंदिवस उग्र रुप धारण करु लागली आहे़ आजघडीला ४५४ गावांमध्ये १९५ टँकरने पाणी पुरविले जाते़ आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर चित्र आणखी चिंताजनक बनणार आहे़ जिल्हा परिषदेने सर्व गटविकास अधिकाऱ्यांकडून आगामी तीन महिन्यांच्या काळातील स्थिती जाणून घेतली आहे़ त्यानुसार जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात टँकरचा आकडा तब्बल ४०० च्या घरात जाईल अशी शक्यता आहे़ माजलगाव वगळता सर्वच तालुक्यांना ंटंचाईची झळ बसणार आहे़ आकस्मिक टंचाई आराखडा सुमारे १० कोटी ७ लाख ५२ हजार रुपये इतक्या रक्कमेचा आहे़ टंचाई आराखड्याची माहिती जि़प़ मधून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे गेली आहे़ आता या आराखड्यानुसार उपाययोजनांना सुरुवात होणार आहे़असा आहे अंदाजित खर्चतालुकाअंदाजित खर्चबीड७४ लाख ५ हजारशिरुर६१ लाख ४३ हजारवडवणी१६ लाख ९४ हजारआष्टी ५ कोटी ९८ लाख ५८ हजारगेवराई७ लाख ७१ हजारपाटोदा७८ लाख २३ हजारअंबाजोगाई५४ लाख ८५ हजारकेज६० लाख ९७ हजारधारुर४४ लाख ८४ हजारपरळी९ लाख ९२ हजारएकूण १० कोटी ७ लाख ५२ हजारप्रशासन सज्ज- नवलकिशोर रामपावसाअभावी पाण्याची समस्या काही भागात गंभीर बनत असली तरी आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे़ सार्वजनिक विहिरींवर विद्युतपंप बसविण्याची योजना ७७ गावांमध्ये राबविली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले़ अंबाजोगाई, केज व धारुरसाठी काळवटी तलावात ४ कोटींची योजना कार्यान्वित केली जाईल़ केजमध्ये जाधवजवळा येथून पाणी आणले जाते़ आष्टीसाठी सीना धरणातून पाणी उपलब्ध केले जाईल़ याबाबत अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविल्याचेही ते म्हणाले़ प्रशासन टंचाई निवारणासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले़उपाययोजना सुरू- जवळेकरजिल्ह्यात गतवर्षी दुष्काळ होता़ यावर्षी जुलै सुरू झाला तरी पाऊस नाही़ संभाव्य धोका लक्षात घेऊन १० कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे़ हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला आहे़ टंचाई काळात कोठेही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी माहिती सीईओ राजीव जवळेकर यांनी दिली़ गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले आहे़ मग्रारोहयोची कामे वाढवून रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले़