शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘वृक्षलागवड करा, अन्यथा पगार नाही’

By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST

जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायतींअंतर्गत वृक्षलागवडींची संख्या फारच कमी असल्याने व सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण समाधानकारक झाल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्

जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायतींअंतर्गत वृक्षलागवडींची संख्या फारच कमी असल्याने व सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण समाधानकारक झाल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व बीडीओ व ग्रामपंचातींच्या ग्रामसेवकांना वृक्षलागवड करून त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली आहे. अन्यथा संबंधित ग्रामसेवकांचे वेतन अदा न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाअंतर्गत शतकोटी योजनेअंतर्गत तसेच मग्रारोहयोअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परंतु आतापर्यंत ग्रामपंचायतींमध्ये वृक्षलागवडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यंदा पाऊस विलंबाने पडल्याने ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड कार्यक्रम राबविला नाही, असे सांगण्यात येते. परंतु गेल्या पंधरवाड्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने व येत्या काही दिवसांतही पाऊस चांगला पडण्याची शक्यता असल्याने सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व ग्रामपंचायतींना वृक्षलागवड करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी बीडीओ व ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती वेबसाईटवर न टाकल्यास संबंधित ग्रामसेवकांचे पगार अदा न करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध योजनांमार्फत मिळणारे अनुदानही थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासदंर्भात उपमुख्य कार्यकारी पी.टी. केंद्रे यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, याबाबत सर्व बीडीओंना व ग्रामसेवकांना पूर्वसूचना देण्यात आल्या असून काही ग्रामसेवक वृक्षलागवड कार्यक्रमाच्या तयारीलाही लागल्याचे केंद्रे यांनी सांगितले. सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत अपेक्षित वृक्षलागवड करून त्याचे संवर्धनही केले जाईल, असा विश्वास केंद्रे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये किमान ५०० तर एक हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किमान १००० वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. आठवडाभरात वृक्षलागवड केल्याची सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर टाकण्याची सूचना ग्रामसेवकांना देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पंचायत विभागाकडे प्रमाणपत्रही देणे आवश्यक आहे.